Tuesday 9 June 2020

LRR PART 5 the beginning of love


Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young girl with me. I keep her in the car. Water was dropping from her clothes and hairs. She was shivering. I wore her my blazer. I was unhappy that I spoil my car's seat covers and blazer for an unknown girl. Okey! She was known but I hadn't any feeling for her and still I was carrying her with me. She was shivering so much that I remind  some Bollywood movies, in which "Heroin was in same situation like Aarchee and hero is in same situation like me. So to save the heroin, hero hugs her and warm her body through his body."
No never, I will never do that. I said myself. Its better to find out an hospital. I got a small village on the way. Where I find one small hospital. I got my smile. In that hospital there was only one wardboy, one nurse and a lady doctor. The wardboy inform nurse. Who was sleeping. She changed Aarchees cloths and rubbed her palms and foot. Aarchee was not responding anything. Looking Aarchee's situation she frowned her eyebrows,"Is you have done something with her?" She asked me thinking that I had done some thing like.....  rape.
"Oh! No mam. I haven't done anything."
"Then how's she become unconscious. Even now after rubbing her hands and leg's. She isn't responding."
"Actually she was so happy to hear that soon we are going to marry. And she collapsed while she was playing in rain happily."
Wow I had made a good story to save myself. I was just hoping that she doesn't call police.

I had to join my office from next day. But because of all this matter it seems impossible. As Aarchee entered in my life, one by one I was facing worse situations. However I managed leave for one more day, only I know.
It was mornings 11:00 O'Clock and my surprise that Aarchee murmured my name. Why?
"She is being conscious." Nurse said,"Speak with her. To listen your voice she will feel good."
But what about my feelings? I took Aarchee's hand in my hand to show nurse that I am really her fiancé.
"Ram!" Aarchee was shocked to see me. That she shouted loudly "Ram,Ram!"
My situation was so bad. Nurse has frowned her eyebrows again.
"Aarchee I am your Ram. Remember yesterday night you were dancing happily in rain and your leg slept. Then you become unconscious so I took you here in hospital."
She was stern. " I don't remember anything, my name, my place ... Nothing."
I was finished. What more remained to happen! She had lost her memory. Doctor advised to show her a neurologist. I was so confused about my next step. What I should do? The thing I should do before , when I got Aarchee. Give a call to my dear sister Meera and inform her about her best friend. I called Meera
 " Hallo Ram." Mom had taken the call. 
"Hi mummy. Where is Meera?"
"At home. But in tension."
"Why ? What happened?"
"Nothing much. Her friend Aarchee is missing from last night and there is rumor that she is characterless and ran with her lover."
"What Meera thinks?"
"Same. But I don't believe. She is very nice girl."
"OK mom ! I will call you letter.''
"OK ! See you."
Continue..... 
To read further stay tuned with me.

©®Archana Sonagre Wasatkar
All rights reserves to writer. Please don't publish any part of the story anywhere. 
Thankyou 😇

Note-Photo from google with regards. 

LLR Part 4 The Revenge

Aarchee :- Jivan didn't shows his face till my parents arrival. And my surprise that he went to pick up mom dad on airport. I felt irritate in his presence. But for sake of mom dad I tolerate him thinking that its last time to be with him. Very soon the relation will break and I will be free.
Finally he left and I got time to speak with mom dad. I told them whole incident. They also got a big shock to listen about Jivan's behavior. But my dad has a very kind heart and so they said I should give one chance to Jivan. I agreed with him saying that first I want to see his reaction on my rejection.
We invite Jivan for dinner. After a quite dinner we sit for talk. My father told him my decision. He reacted as he knows that. "It will be dangerous for Aarchee. She should have to marry with me." He said to my dad.
My dad understand that why I said to see Jivan's reaction."You are scaring us! Its showing your inner attitude." Dad said him,"I think Aarchee is right about you."
"I just want to keep things as before."
"But we don't want now."
"You must see the MMS , you received now." Jivan has sent a MMS to dad. He was looking so much angry after watching that MMS. "What the hell is this?" Dad asked in anger. To listen him Mom and I, both run to balcony.
"What happen dad?" I asked him,"You are okey?"
"Go and see your mobile. You will get what happened?" Jivan told me. I can't believe he had made my MMS, in which I was kissing someone. When I saw that MMS again and again. I got that the MMS was real. Once Jivan had come to our house. He was in different mood and tried to be intimate with me. But after kiss I forced him to just leave the house. I had not noticed that He was shooting that time. If I had been intimated  with him that day , I was must watching the whole thing. I frightened myself.
"How can you do this Jivan?"
"Everything is fare in love and war."
"Your love is cheating."
"Aarchee!!!" Mom yield as dad fainted on the floor. He had gotten a miner heart attack.
Being a daughter, my parents supported me so much. They did every good thing for me. And now the most important segment, marriage, their dream for me had become a dark night. Dad was hospitalised. Doctor told to listen his everything. Try to keep him happy. So I made my mind to marry with Jivan. I didn't wanted to give dad more pain. But destiny always walk apposite. After being conscious Dad confirm that Jivan is not in the hospital and said me to go far from Nagpur. Where Jivan wouldn't find me. One of his graduation friend was living in Bangalore. Dad advised to go there for some time. Then they will join me. I was not ready but as doctor said to follow Dad's everything. I took that painful decision and left hospital. Dad has given me ATM and said to withdraw all money and break the ATM. Because Jivan can track ATM cards use also. I was too much upset. Dad had strictly warned not to call them. "I will not die before see you married with a lovely guy." Dad's last word's!
I got a Volvo for Nagpur to Bangalore at 7pm. Dad had already informed his friend about me. So I had to be there just in time. I was so much sad. I wanted to cry but there was no one to give me shoulder. The person whom I trusted, Mira she didn't wanted to listen a word from me. After leaving hospital I called her and told about dad. 
"You are responsible for his heart attack." She replied coldly,"Jivan loves you so much. Respect his love and marry with him. It will settle all things."
"Jivan called you?" I asked her.
"Yes. But that's not important."
"It is. Because your words are not your own."I told her,"See Meera I know you afraid that I will try to break Ram's engagement. But believe me I just don't want Jivan in my life."
"Whatever Aarchee but I can't take any risk. And husband wife's fightings are normal."
"He slapped me dear."
"You had done like this. Okey ! Now good bye."
Continue..... 
Stay tuned to read further 😇
©®Archana Sonagre Wasatkar
All rights reserves to writer. Please don't publish any part of the story anywhere. 
Thankyou 😇

Note-Photo from google with regards. 

Saturday 30 May 2020

मी अहिल्या होणार गं

आज 31मे 2020 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीला माझा प्रणाम. राजमातेचा शिवलिंग हाती असलेला हा एकच फोटो मी लहानपणापासून घरी पाहिलेला. त्यामुळे अहिल्यादेवी ह्या खूप धार्मिक असतील असे मला वाटायचे . तसेच त्यांनी महादेवाची जागोजागी मंदिरे बांधल्याचेहि ऐकून होते. 

पण सविस्तर इतिहास संशोधन केले असता असे लक्षात येते कि अहिल्यादेवी ह्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. जशी त्यांची महादेवाच्या ठायी भक्ती होती तशीच त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती. सर्वधर्म समभाव त्यांच्या हृदयीं होता. म्हणून त्यांच्यावर प्रजेचे प्रेम होते. वेळ पडलि तेव्हा तलवार घेउन रणांगणात उतरल्या . स्त्रियांना शिक्षित केले. त्यांची फौज निर्माण केली. अन बंडखोरांचा बंदोबस्त केला. रामायण किंवा महाभारतात किती युद्ध झाली आणि स्त्रिया विधवा झाल्या पण कोणी विधवा स्त्री सती गेल्याचा कुठेच उल्लेख नाही. अशी उदाहरण देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे माता अहिल्यादेवीने जनतेला पटवून दिलं. विधवांना पतीची मिळकत स्वतः जवळ ठेवता येईल अशी तरतूद केली. तसेच विधवांना मुलं दत्तक घेता येणं सोपं केलं. त्यांनी पडदा पद्धत कधीच पळाली नाही. त्या रोज जनता दरबार भरवीत असत आणि लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास हजर असत. त्यांनी जातपात मानली नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे त्यांच्या कन्येचा विवाह यशवंतराव फणसे या इतर जातीच्या पण गुणी आणि शूर तरुणाशी करून दिला होता. त्या धर्मपारायण होत्या पण केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्नछत्रे उघडली, विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, आश्रमशाळा बांधल्या. लोकं त्यांना तत्वज्ञानाची राणी म्हणून ओळखू लागले. 
पुत्र मालेरावांच्या देहावसना नंतर अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. बाई काय राज्यकारभार करणार? ही दरबारीं मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरवली. 
 अशा कर्तव्यदक्ष स्त्रीच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पुस्तक किती शोभेल ! कल्पना करा अशा त्यांच्या चित्राची खूप छान वाटते. आणि हो मला वसंतराव सोनोने (संदर्भ - 31/05/2016 सकाळ वृत्तपत्रात त्यांच्या लेख) ह्यांनी लिहिलेल्या दोन ओळी खुपच भावल्या . त्या अशा कि , 
सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणाऱ्या टिळकांच्या हातात गणपती किंवा त्यांना गणपतीची पूजा करतांना कोठेही दाखवलेले नाही . परंतु आपल्या तलवारीच्या बळावर व बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाचे राज्य टिकवणारी रणरागिणी अहिल्याबाईंना जाणीवपुर्वक दुर्लक्षित ठेवले . त्यांना त्या फोटोच्या चौकटीत जणु कैद केले. असे मला मनापासुन वाटते. 
इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी राजमाता अहिल्यादेवीची तुलना रशियन राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. ती अशीच नाही ना....
नुकतंच विजया जहागीरदार यांचं 'कर्मयोगिनी' हे पुस्तक वाचलं. अप्रतिम व्यक्तिमत्व राजमाता अहिल्यादेवीचं डोळ्यांसमोर उभं राहिलं. प्रत्येक स्त्रीनं अंगिकारावं असंच. 
राजमाता अहिल्यादेवीच्या चरणी आपल्या आवाजाची श्रद्धा सुमनं अर्पित करावी म्हणून यु ट्यूब वर गाणं शोधलं. तेव्हा अहिल्याफिल्म्स चं, "मी अहिल्या होणार गं !" हे गाणं मिळालं. खूपच सुंदर शब्दांकन. लेखकाचा आणि गायिकेचा उल्लेख नाही तिथं म्हणून इथेही नावं लिहिली नाहीत.
शेवटी दोन ओळी या गाण्याच्या, 
नारी जातीत जन्म घेतला, अहिल्या होणार गं 
पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनि भंडारा लेणार गं 
मी अहिल्या होणार गं 
मी अहिल्या होणार गं !
फोटो साभार गुगल वरून 🙏
(नोट : माझा या लेखाद्वारे कोणावर टीका टिपणी करायचा मुळीच उद्देश नाही. तरीही एखाद्याचं मन दुखलं असेल तर क्षमस्व असावे.)

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Master of labour studies 

Master diploma of counseling in mental health

archusonagre@gmail.com

लेखाचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरू नये ही विनंती आहे.
धन्यवाद !

Thursday 28 May 2020

LRR Part 3 The revelation





Love, Revenge & Relationship part 3
The revelation 
Archee :- My parents were so happy that their only child , their daughter was going to marry with the right person. Jivan had impressed them so much by his gentle and caring behaviour. He had won their trust. When my parents went for a holy tour in east Asia & Jivan has came Nagpur for some official training. My parents permitted Jivan to stay at our home with me. He was senior engineer in Mahagenco. His parents also tell us to do marriage shopping. As there were only 2 months remained for our marriage. He used to return home in evening. We used to go for long drive on dad's bike. After dinner he used to return his friends home & speak with me on mobile till I didn't sleep. I asked him to stay with me but he told me that he didn't wish to happen anything between us before marriage. As there was a ritual in which bride has to prove her virginity. This one thing disturbed me many times. But I thought Jivan will look after everything. 
That was not rainy season still there was heavy rain fall Going on. It seems that something unexpected was going to happen. As my so called guilt had made me irresistible I decided to tell about my first choice truth to Jivan. That Saturday night he came to home. I cooked food for him. We did dinner and went on for walk. We discussed so many things for future. I felt good vibrations. So when we return home , I took his hand in my hands and told him that I still have feelings for someone else and the person is none other than Meera's brother,'Ram!' And oh god, in few seconds my whole body shiver .
I couldn't understand what happened next. Blood was running from my nose , ear and mouth. Jivan's hand was so strong. He slapped me hard in rage. I had never seen his this side. He was behaving like a monster. He broke down many things like flower pots, window glasses and tea pot, whatever comes in his hand he just throw it on floor. After some time he left the home saying ,"Never dare to take anyone else's name. You are only mine and I am not going to leave you for anything. Keep in mind. Otherwise you have to live in hell."
I had totally broken. What I had thought and what happened. He, whom my parents chose for me, whom they believed as angel, he slapped me as I was a criminal, he tortured me so much mentally and physically. He behaved like an animal. 
"You know what I am feeling," he hold my neck, "I should do your rape & hang you to the fan. But then I have to find another dumb girl like you. & in this era it's very hard to find a virgin girl." He left my neck & went to his friends. My home had become a dumping zone. The night was turning point of my life.
I had gotton that I was on wrong path with wrong person, who did not bare a small truth of my life. The truth was just a feeling. If he can not give me a little space then how will he share whole life with me. It was just a starting as I wanted to keep him in trust. I just wanted that he knows me, my liking. And what he did. He broke me. He frighten me. I had taken right decision to tell him truth. Because he may kill me if I tell him about Ram after marriage.
 I had made my mind to break engagement with Jivan. My parents had 3 more days to come from Thailand. I hadn't any wish to spoil their trip. So didn't let them know anything. But it was so hard to tolerate all things alone. And I had someone who was an important part of my life. Meera, my best friend. She was both , my brother and sister also. I mate Meera and told her how roughly Jivan behaved with me. She said that she is with me for my decision. She will help me to break the engagement. I was so relaxed. Just waiting for mom and dads arrival.
I had decided not to marry with Jivan for any cost. But I was not aware that the cost is so high that I have to lost my dignity.
Continue.... 
©®Archana Sonagre Wasatkar
All rights reserves to writer. Please don't publish any part of the story anywhere. 
Thankyou 😇

Note-Photo from google with regards. 

Tuesday 26 May 2020

ती होती आगळी वेगळी



ती होती आगळी वेगळी,
निराळीच होती तिची कथा सगळी.

कळपात चालनं तिला जमत नव्हतं ,
कुणाची हाजी हाजी करनंही तिला येत नव्हतं ,
चुकलेल्याला उगाचच पाठिंबा देणं योग्य वाटत नव्हतं

इतर स्त्रियांसारखं घरात पाऊल थांबत नव्हतं ,
चार चौघित बसून गप्पा मारनं हिच्यासाठी कठीण होतं ,
कधी कधी खूप एकटं वाटे तीला,
आपण आहोत विक्षिप्त असं वाटे तिला,
कारण काय म्हणतील लोक ?
ह्या रोगाची लागण झाली होती तीला.

म्हणून तिनं तिच्या स्वभावा विरुद्ध पाऊल उचललं ,
आजूबाजूच्या चार चौघीत बसू उठू लागली,
त्यांच्यातील एक म्हणून ओळखले जाण्यासाठी धडपडु लागली.
परिणामी तिचं मन दुखावलं गेलं तिच्याही नकळत,
कारण नको तिथं तिचं अस्तित्व ती शोधत होती.
कदाचित ग. दि. मा. ची 'तो राजहंस एक ' कविता तिच्या वाचनात कधी आलिच नव्हती..

Writer, Archana Sonagre.
PGD in Counseling and Mental Health,
Masters of Labour Studies,
M.A. (Public Admin).

Monday 25 May 2020

मीच माझी गुन्हेगार




मीच माझी गुन्हेगार 

"खूपच त्रास होतोय डॉक्टर. यापेक्षा मरण बरं असं झालंय बघा." चाळीशीत असलेली शारदा डॉक्टरला रडकुंडी येऊन सांगु  लागली.
"मूळव्याध व्याधीच अशी आहे बघ." शारदाला तपासात डॉक्टरीनबाई तिची चौकशी करु लागल्या, "कधी पासून आहे हा त्रास? रक्त कधी पासून पडू लागलं? आधी काही औषधं घेतली का?" 
"साधारण 3-4 वर्ष झालीत त्रास वाढून. रक्त पहिल्यांदा 5-6 वर्षांआधी पडलं होतं. खूपच आग झाली होती."शारदा प्रश्नांची उत्तरं आठवून सांगू लागली. 
"मग डॉक्टरला दाखवलं होतं का?"
"छे ! त्यात काय डॉक्टरला दाखवायचं. असं घरचे म्हणाले मग मलाही वाटलं तिखट खाण्याने त्रास होतोय म्हणून साधं खायला लागली."
"खूपच छान ! अती झाल्याशिवाय आपण बायका स्वतःकडे लक्षच देत नाही आणि मग हे असं भोवते."
शारदा गप्प होती. 
"बरं शी आल्यावर लगेच जायची की थांबून ठेवायची?"
आता शारदाला काय उत्तर द्यावं सुचेना.
"काय झालं? विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे शारदा."
"काय उत्तर देऊ डॉक्टर? लग्न झालं तेव्हापासून आयुष्यात कधी शी आल्याबरोबर मी टॉयलेटमधे शिरले ते आठवतच नाही. सकाळी उठल्यावर सगळ्यांचा नाश्ता, चहा, मग यांचा आणि मुलांचा डबा. एकीकडे प्यायचं पाणी भरून ठेवायची धूम. अशात कधी शी आल्याचं मेंदू मनाला सांगे अन कधी आधी हे करू दे, ते आवरू दे यात ती वेळ निघून जायची समजतच नव्हतं."
"मग शी ला केव्हा जायची?" 
"जेव्हा मोकळा वेळ मिळेल."
"आणि तेव्हा शी खूप कडक येत असेल? हो ना?"
"हो !"
"आताही तसंच करतेस?"
"सवय पडली."
"किती मुलं आहेत?"
"एक मुलगा, एक मुलगी."
"शारदा तुला वाईट नको वाटू देऊ." डॉक्टर उठून शारदा जवळ गेली. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाली, "पण हे खूप चुकीचं आहे शारदा. शी थांबवून ठेवणं हे एक मोठ्ठे कारण आहे मुळव्याधीचे. तुझी मुलगी तुझं पाहुन हेच शिकली तर पुढे तिलाही हा असाच त्रास भोगावा लागेल. अगं फक्त चाळीस वर्षांची आहेस तु आणि तुझं ऑपरेशन करावं लागेल असं दिसतंय."
"नाही, ऑपरेशन नको?"
"तुझा मूळव्याध तिसऱ्या स्टेजला आहे. त्यात इंटर्नल आहे. ज्यात ब्लीडींग जास्त होते. म्हणून तु इतकी अशक्त झाली आहेस. मी माझ्या सर्कल मधल्या अनुभवी डॉक्टर्स सोबत तुझी रिपोर्ट दाखवून सांगते ऑपेरेशनबाबत. पण तुलाही तूझ्यासाठी काही करावं लागेल."
"तुम्ही सांगणार ते सगळं करेल."
"पहिलं, सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायचं आणि शी येताच संडासात जायचं."
शारदाने होकारार्थी मान हलवली. 
"दुसरं रोज सकाळी 15 मिनिट तरी व्यायाम करायचा."
"सकाळी... "
"हो. काही प्रॉब्लेम आहे का? तुझे मिस्टर बसले आहेत ना बाहेर. बोलाव त्यांना."
"नको मी लक्ष देईल माझ्याकडे. खरं पाहता मीच गुन्हेगार आहे माझी. मीच दुर्लक्ष केलं स्वतः कडे. स्वतःला नेहमी शेवटी ठेवलं. आता मी तुम्ही सांगितलं तसं सगळं करेल."
"गुड ! घरातील स्त्री ठीक तर सगळं घर ठीक. आठ दिवसांनी ये." डॉक्टर स्मित करून म्हणाली. 

मी कितीतरी आया बायांना म्हणतांना ऐकलंय, "शी ला जायला फुरसत नाही मला." त्या सर्वांसाठी हा लेख आहे. मला माहित आहे आपल्याला खूप कामं असतात सकाळी पण पाच मिनिट आपण आपल्यासाठी काढूच शकतो ना. आपण स्त्रिया खरंच किती दुर्लक्ष करतो स्वतः कडे. घरातल्या सगळ्यांना वेळेवर नाश्ता करायला सांगतो, त्यांच्या हातात देतो आणि स्वतः मात्र तशाच राहतो अन रडतोही की कोणी मला खाल्लं का असं विचारातही नाही. 10 मिनिट बसून योगा करणंही आपल्याला उगी वाटतं. का? मला वाटतं आपण बदलू तेव्हाच इतरांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. 

फोटो साभार गुगल वरून 🙏

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Master of labour studies 

Master diploma of counseling in mental health

archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे गुन्हा आहे.
धन्यवाद !

LRR part 2 Destiny





LRR - Love, revenge & relationship 
Ram :- Aarchee was so unstable. She wanted to do every thing. She wanted to be a singer, a writer, a lawyer & sometimes She wanted to only travel all over the world. But no proper planning for anything. No idea of how to earn money and no thought that who will pay the Travelling expenses. There was no particular aim. Its stupidity and that's why I thought she is stupid , who is waiting for a guy , who's ATM she will use to live. She was a drama queen also. I saw her dramebaji with Meera at our home. That time I was wanted an ambitious girl who have some aim for life. Who set goals & then go ahead to achieve those goals. Who is independent. Who is studious like me. Who doesn't waste a minute of time and now when I have gotten Shruti, an IT Engineer in Infosys pune, with high salary package, who have high goals for life. A perfect life partner for me. I want to live with Archee. I was stupid or now I have became stupid by living with Archee? Don't know what game destiny is playing with me? 

Aarchee :- I had Made my mind to marry with Jivan. But somewhere I was feeling guilty that I am hiding the truth from him. I thought, I should tell him that he is not my first choice to marry. My first choice is Ram. But you have won my parents heart and so I promise you from now I am only yours for life time. I was aware that its not that easy to understand but I had find out Jivan so much understanding and gentle . So I thought he will forget this and try to make place in my heart . But my destiny had other plans for me. I had seen Jivan's brighter side. Destiny wanted to show me his dark side.

Ram : It was all done. I was happy. There was only three months remain for my marriage with Shruti And that rainy day when I was going bangalore from Anantapur after attending a colleagues marriage ceremony, I found a girl on the side of highway. Shrutee has called me for something. To speak with her I stop the car besides of highway. The girl was unconscious. First of all a doubting thought come in my mind that it can be a trap also. Because there were no one looking so far. That was deserted highway. So I moved my car. But after going 1 km away I thought I shouldn't leave an unconscious girl on highway. And if there is not any trap then she must be there. She was still there. I was not sure to about next. There was only one thing in my mind that some one is in danger and I have to help. I went to her and removed her hair from her face. I was shocked. I blinked my eyes 2-3 times and saw again neatly. She was Aarchee! Aarchee, my dear sister Meera' best friend. What make her to lay on highway?

Saturday 23 May 2020

LOVE, REVENGE & RELATIONSHIP 1 the questions

Love, revenge & relationship 
Part - 1
The questions 


Ram :- I never thought that one day I will love a girl whom I was used to call a stupid. Who was my sisters best friend and stayed at our home for every weekend, don't know for what purpose. Because most of the time I saw them only doing chit chat & watching TV or eating delicious food made by my dear mom rather than doing study. I never notice anything attractive in her. And now I have become crazy for her. Feeling a gravity force which is dragging me to her. I have stuck to her. It seems impossible to separate from her. Because now I got that she is too good at heart, lovely & innocent. But too calm. Don't know why I am feeling so much change in her behaviour. No liveliness, no wildness as before. Just a living flesh. I want to know the reason behind this change. But from whom? She doesn't speak a word. I am feeling helpless. Is she cares about it? 

Aarchee :- Yes! its been 2 month that I am living with Ram and never said a word. Even better that I have become dumb and duff after loosing my family and friendship. Which was my world in good time as well as in bad time and now no one is with me. So there is nothing to say or share with Ram. Everything is plain. No present no future. What I tell him? from where I should start? How I show him the hell of my life? Sometimes I feel that I am getting hallucinations. I have became mentally ill. There is nothing remained in life to live for. My parents are suffering their life because of me & I am here living with ram a comfortable life. I am so much selfish, a coward. A dull girl. Only these things about me I can tell Ram. Will he understand it? 

Ram :- I want Aarchee in my future as my companion for life time. After all there is no difference in our relation and an husband wife's relation. One can say that we are live in relationship. Though both of us never mention that because we are just living  with each other without any hope. Except one hope from my side , that Archee will accept my marriage proposal. Is she will accept? Okay If she accepts my proposal what I will tell my parents? How Meera will react? & Shrutee? I have forgotten her. Is she will forgive me? After all I am her fiancé. Just 3 months before our engagement ceremony has happened with huge celebration. & now I want to break it for the sake of Archee.🙇 Is she understand this? 

Aarchee :- Marriage ! Every parent has a dream to see their children happily married. My parents had one and so they choose Jivan for me. Calm, good looking, simple with good earning more than enough for family requirement. There was no chance to say no to him. Though my first choice was Ram but he was just a dream for me. Getting married with Ram is impossible for me. Because his own sister and my best friend , Meera has told me that Ram will never accept me as his life partner. As there were so many differences among us. She was right somewhere, because we were really different.

He was calm and I was loud,
He was so studious and I was far from study,
He used to play with machines and I used to play with words.
He was a kingfisher and I was songbird.
More on , 
He was stable as sea and I was a moving river.

But then why we mate & hooked up with eachother?

May be 
We mate because, after all, river moves to meet the sea
& in the end she (river ) meets the sea !
Is it really? 
There are lots of questions & very few answers. 

Continue.... 
©®Archana Sonagre Wasatkar
All rights reserves to writer. Please don't publish any part of the story anywhere. 
Thankyou 😇

Note-Photo from google with regards. 

My book - LOVE, REVENGE & RELATIONSHIP

to read part 1of love revenge & relationship click here

Hi friends. I am Archana. Before 6-7 years there were lots of stories born in my mind to write novel. One of them is 'LOVE, REVENGE & RELATIONSHIP'. I wrote  20 parts of it on my blog miarchanasonagre.blogspot.com Then I got busy with some other things like job, family & couldn't write further story. In lockdown time I read those 20 parts & found the story beautiful. So I have decided to write the story / novel again with proper ending.😊  

The story is about a 24yr old young wonderful, wild & lovely girl. Who is engaged with a charming 27yr old guy. Soon they are going to marry. But before the wedding ceremony take places some unbelievable incident happened & the young women's life turns to an unpleasant dream. She losses everything....... & live a life of trash. Why, what & how?

 To know the answer's please stay tune with me. Follow me. 😇
Hope you will enjoy reading this novel. You Will understand how destiny ruined our life to fulfill our dreams. Falling love with the main lead Archee & Ram. & hate the villain too. Also if you like the story please do like & share it with your friends.


Wednesday 20 May 2020

एवढंसं पिलू माझं





एवढंसं पिलू माझं 

टुणूक टुणूक शाळेत जातं. 

काय समजतं, काय उमजतं 

त्याचं त्याला माहित !

हिंदी मात्र खुप छान बोलतं, 

स्वतःशीच कधीतरी इंग्लिशही बडबडतं !

माझ्या कानाशी येऊन भिंगोट्यासारखं गुण गुण करतं !

सारं काही ठीक, 

पण पाठीवरचं ओझं पाहून काळीज धडधडतं. 

पोर तर अजून पाहिलीतच जातं, 

परीक्षेसाठी सारं घर डोक्यावर घेतं. 

इतकं तर आम्ही दहावीतही नाही शिकलं, 

जितकं इंग्लिश त्याचं आताच पाठांतर झालं. 

कळत नाही केव्हा पोर इतकं मोठं झालं? 

कवितेचे सर्व हक्क कवयित्रीकडे राखीव आहेत. परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित किंवा प्रस्तुत करु नये ही विनंती. 
धन्यवाद 
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Tuesday 19 May 2020

स्वीकार भाग 13

स्वीकार भाग 12 इथे वाचा
डॉक्टर जयानं अरुला CBT थेरेपी देणं सुरु केलं. अरुनं पाचव्या महिन्यापासून बालाजी तांबे यांच्या 'गर्भसंस्कार' वर्गाला जाणं सुरु केलं. काही संस्कार वर्ग रवीनंही तिच्यासोबत अटेंड केले. ध्यान आणि गर्भवतीला फायदेशीर ठरतील अशी योगासनं डॉक्टरच्या सल्ल्यानं ती करु लागली. अमननं घर खेळण्यांनी भरून टाकलं. नवीन बेडशीट, परदे घरात आले. गोड गुबगुबीत बाळांचे फोटो आराधनाच्या खोलीत लावले गेले. सगळीकडे आनंदी आनंद झाला.
तिला एकच वाटे आपल्यामुळे यांना जास्त त्रास होऊ नये. पण नववा महिना सुरु झाला तेव्हापासून उठण्या बसण्यात तिला जास्तच त्रास होऊ लागला. झोपतांना तर बाळ छातीशी आल्याचा भास व्हायचा. मग झोप लागत नसे. श्वास घ्यायला त्रास होई. पायाच्या तळव्यांची आग होई. तिच्या मनात येई, 'स्वतःच पोट फाडून बाळाला बाहेर काढून टाकावं.' तिची चीडचीड वाढली. बाळंतपणाच्या आधी येणाऱ्या नैराश्यानं तिला ग्रासलं. अशावेळी आई तिच्या तळपायांना तूप लावून कास्याच्या वाटीनं घासे. तिला झोप लागावी म्हणून रवी  डोक्याची मालीश करे. ती झोपे पर्यंत तिच्या केसांमधून हात फिरवी. राधा चंदन सुगंध असलेली मेणबत्ती लावी. त्या मंद प्रकाशानं आणि सुगंधानं तिला बराच आराम मिळायचा. संगीत थेरेपीनंही तिला खूप बरं वाटे. ती हे सगळं डायरीत लिहून ठेवायची.
अशातही अरुचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. सोसायटीच्या बायांनी आपणहुन हजेरी लावली. नायक बाईनं अरुची ओटी भरली,
"जे झालं ते विसर बाई. अशीच निखळ अजून. काही लागलं सावरलं तर आम्ही आहोतच."
नववा महिना पूर्ण झाला त्या दिवशीच अरुचं सिझर करण्यात आलं. मुलगी झाली. अरु आणि रवी सारखीच गोंडस.
"अमन आणि अर्णवला बहीण आली गं अरु!" रियानं अरुला बाळ दाखवत सांगितलं. बाळाला पाहुन अरुच्या डोळ्यात पाणी आलं. आपण आयुष्यात कधी आईपनही जगू शकू असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनात काही ओळी तयार झाल्या,
थोडं हसायचं, थोडं रडायचं,
सर्वांना सोबत घेऊन चालायचं,
इच्छापूर्ती होईलच कधीतरी,
थोडया वेळानं झाली म्हणून,
वाईट न मानायचं,
आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकायचं !
अर्थातच रवी आणि घरच्या इतरांची खरी परीक्षा आता सुरु झाली. बाळंतपणानंतर अरुला नैराश्याचे झटके येऊ लागले. पण तिची आई, राधा आणि उषा काकू सगळ्याच परिस्थितीला तोंड द्यायला तयार होत्या. अरुच्या बाळंतपणाआधी डॉक्टर जयानं  तिघींचंही समुपदेशन केलं होतं. समुपदेशनची गरज रुग्णासोबत त्याच्या घरच्यांनाही असते. बाळ झाल्यावरही अरुची दिनचर्या तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न होऊ लागला. तिची झोप व्हावी म्हणून बाळाला रात्री अरुची आई जवळ घेऊन झोपत असे. वरचं दुध बाळाला देण्यात येई. ज्यामुळे अरुची छाती भरून येई. रोज सकाळ संध्याकाळी दुध पम्पनं काढून घ्यावं लागे. तेव्हा तिला खूप वाईट वाटे. पण ती स्वतःला समजवायची की हे बाळाच्या भल्यासाठी जरुरी कसे आहे.  पूर्ण झोप आणि इतर थेरेपीजनं अरुला बरं वाटे.
बाळ सव्वा महिन्याचं झाल्यावर 20-25 लोकांच्या उपस्थितीत नाव ठेवण्यात आलं. ईरा !
नाव ठेवल्यावर रिया लंडनला परत जाणार होती. पण महेशनं सांगितलं की तो नेहमीसाठी भारतात परतण्याचा विचार करतोय. बंगलोरला एका कंपनीनं त्याला छान जॉब ऑफर दिली आहे. सगळं सावरून यायला 1 महिना लागेल. तिला खूपच आनंद झाला. ती काही दिवसांसाठी माहेरी गेली.
पाहता पाहता सहा महिने लोटले. आपल्यामुळे राधाला प्रायव्हसीच मिळत नाही. हे ठीक नाही. म्हणून रवीनं त्याचा कात्रजचा फ्लॅट विकून राधाच्या शेजारचा फ्लॅट विकत घेतला. अरु घरात राहून बोर झाली आणि तास तास उदास बसू लागली. तिला असं पाहुन रवीनं तिला डॉक्टर जयाकडे नेलं.
"आराधना जॉब करायचा आहे?" डॉक्टर जयानं विचारलं.
"हो." तिचा चेहरा आनंदानं फुलला.
"माझी असिस्टंट म्हणून जॉब करशील?"
"मी आणि तुमची असिस्टंट?"
"हो तुझ्यात ते पोटेंशियल आहे गं."
"सॉरी डॉक्टर मधात बोलतोय. पण अरुला दगदग झेपेल का?"
"रवी बघ सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2 तास माझं हे  क्लिनिक उघडं असतं. बाकी वेळ मी दुसऱ्या क्लिनिकमधे असते. अरुचं काम फक्त जे कोणी रुग्ण येतील त्यांची पूर्ण हिस्ट्री घ्यायची आणि माझ्याकडे पाठवायचं इतकंच राहणार. तसंच यामुळे ती माझ्या निगराणीतही राहील."
"ठीक आहे मग."
अरु परत काम करायला लागली, तिचा वेळ छान जाऊ लागला. मनाचा आणखी सखोल अभ्यास करता यावा म्हणून अरुनं माणसशास्त्रात पदव्युत्तर पदवीला दाखला घेतला. ती फक्त प्रॅक्टिकल करायला कॉलेजला जायची. आत्मनिर्भर झाली आणि ईरालाही भरभरून प्रेम देऊ लागली.
समाप्त.
आशा करते वाचकांना माझी ही कथा कादंबरी नक्कीच आवडली असेल.
तशी ही कथा आराधना आणि रवीचं लग्न होतं तिथंच संपवणार होते. पण मला वाटलं की लग्न जुळतांना मोठा प्रश्न असतो तो, मुलीला बायपोलर असो किंवा शुगर बाळ होणार का? आणि झाल्यावरही ते निरोगी होणार की नाही? म्हणून हे दोन भाग लांबवले. बाकी बायपोलर बद्दलही माहिती हवी असेल तर तशी कमेंट करा. मी त्यावरही एक भाग लिहिल.
माझा काही खूप सखोल असा बायपोलरचा अभ्यास नाही. तरीही मी ही कथा कादंबरी फक्त आणि फक्त वाचकांनी मानसिक विकार असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवावा आणि कोणालाही असा काही त्रास असेल तर त्यानं सायकोलॉजिस्ट किंवा सायकिऍट्रिस्टची मदत घ्यावी या हेतूनं लिहिली आहे.
धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 12

स्वीकार भाग 11 इथे वाचा
रवीनं राधाला फोन करून अरूबद्दल सांगितलं. तिनं लगेच माधव सोसायटीच्या सिक्योरिटीला कॉल करून अरुबद्दल विचारलं.  तेव्हा कळलं की अरु बस स्टॉपवर गेली तर होती पण लगेच परत आली. राधाने रवीला घरी जायला सांगितलं आणि ती स्वतःही घरी गेली. रवीनं त्याच्याजवळच्या चाबीनं दार उघडलं. त्याला अरु हॉल मधेच सोफ्यावर झोपलेली दिसली.  तिचा पर्समधे असलेला मोबाईल वाजतच होता. त्यानं मोबाईल काढला. राधाचा कॉल होता. रवीनं तिला घरी नाही आली तरी चालेल सांगितलं. थोडयावेळात अरुला जाग आली.
"तु ठीक आहेस ना?" रवीनं तिला विचारलं.
"हो. म्हणजे नाही. मला दोन तीन दिवसांपासून काहीच करा नाही वाटत आहे बघ. फक्त झोपायची इच्छा होतेय."
"उदास वाटतेय का?"
"हो तसंच काही. हुरूप नाही वाटत कशाचाच."
"बरं मग सांगायचं तसं. चल आपण डॉक्टर जयाला भेटून येऊ."
"हो तेच ठीक राहणार."
डॉक्टर जया एक नामवंत सायकिएट्रिस्ट. पूर्वा अरुची केस त्यांनाच सोपवून दिल्लीला गेली होती.
"मला जरा वेगळीच शंका येतेय." डॉक्टर जया अरुला तपासून म्हणाल्या.
"कसली शंका."
"अरु प्रेग्नेंट असल्याची."
"काय." रवी खुर्चीतुन उठून उभा झाला,"अहो मी तेरा वर्ष वैवाहिक आयुष्य जगलो पण मला बाळ नाही झालं."
"म्हणजे तुम्हाला अरुवर संशय आहे."
"नाही मुळीच नाही. पण म्हणून मी अरुसोबत लग्न झाल्यावर या गोष्टीचा विचारच नाही केला इतकंच सांगायचं आहे."
"तुम्ही टेस्ट नव्हत्या केल्या का मग तुम्ही आणि तुमच्या पहिल्या बायकोने?"
"नाही आम्हाला कमी कोणात आहे हे माहित करून कोणालाच हिणवायचं नव्हतं."
"बरं मग तुमच्या पहिल्या बायकोला मुल झालं का दुसऱ्या लग्नानंतर?"
"नाही, तिनं एक मुलगी दत्तक घेतली."
"ओके ! मी नर्ससोबत अरुला पाठवलं आहे युरीन टेस्ट साठी."
"पण डॉक्टर या वयात आणि अशा मानसिक स्थितीत बाळ... "
"मलाही तोच प्रश्न पडला आहे." अरु नर्ससोबत आत येऊन म्हणाली, "टेस्ट पॉझिटिव्ह आहे."
"डॉक्टर हेमा बिनीवाले, ही माझी मैत्रीण आणि चांगली गायनॅक आहे. तिला भेटा. तूझ्या सगळ्या तपासण्या करेल ती आणि बोलेल माझ्याशी. पण महत्वाचे हे आहे की तुमच्या दोघांना बाळ हवं आहे की नाही?"
दोघांनी एकमेकांकडे बघितलं.
"घाई नाही. आरामात घरी जाऊन बोला आणि ठरवा. कारण खरी परीक्षा बाळ झाल्यावर राहील. बाळ झाल्यावर अरुला सतत कोणीतरी मायेचं, तिची आपणहुन काळजी घेणारं सोबत लागेल. ज्याला तिच्या मानसिक परिस्थितीची पूर्ण जाणीव असेल. बाकी मूड डायरी तर तुम्ही ठेवलीय ते छान."
...............
अरुला घेऊन रवी डॉक्टर हेमाकडे गेला. डॉक्टर हेमाने तिच्या सर्व टेस्ट केल्या. सोनोग्राफी केली.
"सोनोग्राफीत बाळाची वाढ योग्य दिसते. बाकी ब्लड रिपोर्ट उद्या मिळतील. ज्यानं आपल्याला आराधनाचं हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि शुगर कळेल. रिपोर्ट आले की मी बोलते जयासोबत." डॉक्टर हेमा म्हणाली.
रात्री दोघही घरी आले. दोघेही गप्प होते. राधाला वाटलं यांचं काहीतरी बिनसलं वाटतं. ती गरम गरम कांदे भजे घेऊन त्यांच्याजवळ गेली.
"घ्या गरम गरम भजे खा. नाहीतर अतुल एकटा संपवायचा सगळे."
"हो ते मी करु शकतो."
अरुला भज्यांचा तळणाचा वास सहन नाही झाला. तिनं  नाक दाबून घेतलं.
"अगं काय हे?  भजी तर आवडती आहेत ना तुझी?"
"हो पण मला आता मळमळ होतेय त्यांच्या वासानं."
"काय? राधाला अमनच्यावेळी असं व्हायचं. काय रे रवी काही गोड बातमी आहे की काय?"
"अतुल काहीही."
"अतुल बरोबर बोलला." रवी म्हणाला. त्यानी डॉक्टर जयानं बोललेलं सगळं राधा आणि अतुलला सांगितलं.
"मग काय ठरवलं तुम्ही?" राधानं त्याला विचारलं, "मी आहे ना जातीनं सगळं करणार अरुचं. तुम्ही दोघं फक्त हो म्हणा."
"खूप भीती वाटते गं राधा मेनोपॉज यायच्या वयात हे बाळंतपन!"
"असं समज तुला वयाचं 48 वं नाहीतर 28 वं वर्ष सुरु आहे. म्हणजे भीती वाटणार नाही."
"काहीही राधा."
"अगं खरंच. चल तूझ्या आईला ही गोड बातमी सांगू." राधानं फोन हातात घेतला.
"राधा अजून रिपोर्ट नाही आलेत. ते आल्यावर सांग  त्यांना."
"ते काहीच नाही. त्यांचा हक्क आहे हे सगळं माहित असण्याचा."
राधानं महेशला व्हिडीओ कॉल लावला. अरुची बातमी सांगितली. त्यांना खूप आनंद झाला.
"अरु आनंदी दिसत नाही." रियानं तिचा चेहरा वाचला. तेव्हा राधानी इतर गोष्टींची कल्पना त्यांना दिली. बाळ झाल्यावर अरुला पोस्टपार्टमचा (मातृत्वानंतर येणारे नैराश्य) त्रास होऊन तिची मानसिक परिस्थिती बिघडू शकते. तेव्हा अरुजवळ 24 तास कोणीतरी लागेल आणि बाळाला पाहायला एकजण वेगळं लागेल.
"इतकंच ना! मी पुढल्याच महिन्यात येते तिकडे. तु काळजी करु नकोस. आपण मिळून करु सगळं." अरुची आई म्हणाली.
"हो, आम्ही आईला पाठवतो तिकडे आणि बाळ झाल्यावर मी येते 2 महिने नक्कीच राहीन माझ्या नणंदबाईसाठी."
"का इतका त्रास घेताय तुम्ही सर्व." अरु चिडक्या स्वरात म्हणाली. तिचा मूड बदलतोय हे पाहुन रवीनं तिची मूड डायरी तिच्या हातात दिली. अरुला डायरी पाहताच लक्षात आलं आपला मूड बदलतोय. ती शांत झाली.
"काही त्रास वगैरे नाही अरु. तूझ्या हिश्याचंच तुला देत आहोत."
"मग ठरलं आपल्या घरी लवकरच पाळणा हलेल." अतुल म्हणाला, " तोंड गोड करायला हवं होणाऱ्या आई बाबाचं. मी काहीतरी गोड घेऊन येतो."
अरुचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले. अरुला इतर काही त्रासही नव्हता. अरु आणि रवीनं डॉक्टर जयाला ते बाळाला जन्म देणार हा निर्णय सांगितला. त्यांनी दोघांचं अभिनंदन केलं. डॉक्टर हेमासोबत बोलून त्या म्हणाल्या,
"अरु तुझं शारीरिक आरोग्य उत्तम आहे. तरीही बाळंतपण इतकं सोपं होणार नाही. पण जवळ जवळ सगळ्याच मातांना बाळ झाल्यावर नैराश्याला समोर जावं लागतं. तुझी काही औषधं कमी करते, काही बदलते पण औषधं घ्यावीच लागतील. म्हणून बाळाला तुझं दूध पाजता येणार नाही. म्हणजे वरचं दूध देऊ. आता इतकंच. बाकी दर महिन्याला आणि जेव्हाही काही त्रास वाटला फोन करून ये."
"एक शंका आहे."
"बिनधास्त बोल गं."
"माझा हा विकार अनुवांशिक रित्या बाळाला होऊ नये यासाठी काही करता येईल का?"
"खूप महत्वाचा प्रश्न विचारला तु. असं आहे बघ याबाबत मी सुद्धा काहीच कन्फर्मेशन नाही देऊ शकत. कारण खूपदा असं दिसून येतं की आईबाबांची बायपोलरची हिस्ट्री असूनही मुलांना तसला काहीच त्रास नसतो. आणि एकदम सामान्य पारिवारिक इतिहास असूनही काहींना गंभीर मानसिक आजार होतात. त्यातही बाळ पोटात असतांना तुझं मानसिक आरोग्य कसं आहे? त्या गर्भावर तु काय संस्कार करतेस यावर सगळं अवलंबून आहे."
"असं असेल तर मी माझी उत्तम काळजी घेईल."
"घ्यायलाच हवी. काय रवी!"
"हो आम्ही अरुसाठी पूर्ण दिवसाचं वेळापत्रक परत तयार करतोय." रवीनं दाखवलं नाही पण मनातून त्याला अरुची खूप चिंता वाटत होती.
"गूड! पण तिची काळजी घेतांना स्वतःला विसरू नकोस.'' डॉक्टर जया त्याचे भाव टिपून म्हणाली.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 11

स्वीकार भाग 10 इथे वाचा
अरु रोज रवीसोबत पराठा शॉप मधे सकाळी 8 वाजता जाऊ लागली. दोन कुक आणि दोन वेटर असा स्टाफ होता. रवी मार्केटिंग सांभाळायचा आणि अरु कस्टमरला. तिचं लाघवी बोलणं, हसून ऑर्डर घेणं आणि विचारपुस करणं तिथं येणाऱ्यांना भावून जायचं.
एकदा एक पन्नाशीतील स्त्री तिच्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन शॉपमधे आली.
अरुनं त्याला हाय केलं आणि काय खाणार ते विचारलं.
"नमस्कार, पोहा पाहिजे." तो म्हणाला.
"मॅम तुम्ही?"
"मला आलू पराठा."
"ओके."
अरुनं कुकला आलू पराठा आणि पोहा बनवायला सांगितलं. "किती वेळ लागेल?"
"पाच मिनिट फक्त."
"अच्छा. तुम्ही नवीन ना इथे?"
"हो."
"आधी कुठे होतात? आणि हे (रवीकडे बोट दाखवून) तुमचे मिस्टर का?"
"आमचं लग्न होणार आहे. ते आधी लद्दाखला नोकरी करायचे आणि मी नागपूरला असायलम मधे होती. आता 3-4 महिने झाले मला तिथून निघून."
"काय? एक वेडी बाई इथे काम करतेय?" तिनं नातवाला तिच्याजवळ घेतलं जसं काही अरुला काहीतरी संसर्ग झाला अशी ती 2 हात दूर गेली अरुपासून, "तुमचं हे शॉप बंद व्हायला हवं. आमच्या मुलांवर काय संस्कार होतील अशाने?"
काय झालं हे पाहायला रवी त्यांच्याजवळ आला. त्याच्या मनात आलं त्या बाईला खूप खरी खोटी ऐकवावं. पण अरुनं त्याला थांबवलं.
"अरु !"
"असू दे. हे होणारच होतं. हेच मला तुला दाखवायचं होतं. माझा सामान्य म्हणून स्वीकार नाही करणार हा समाज. याची झळ तुला बसेल. जे मला नकोय."
"आम्ही बोलू काही." एक सत्तरीच्या आसपास असलेलं जोडपं उठून त्यांच्याजवळ आलं.
"हा काही हवं का? सॉरी आम्ही आमच्याच गोष्टीत बिझी झालो होतो."
"असू द्या. आम्ही ऐकलं सगळं. त्याबद्दलच मला तुम्हाला काही सुचवायचं आहे." जोडप्यातील काकू प्रसन्न हसून म्हणाल्या.
"काय?"
"तु कर्वे शिक्षण संस्थेत सहा महिने किंवा एक वर्षाचा  समुपदेशनाचा कौन्सिलिंग इन मेंटल हेल्थ कोर्स कर. तुला स्वतःला आणखी चांगल्यानं जाणून घेता येईल. तसेच इतर जे रिहॅब सेंटर आहेत त्यांच्या भेटी घे. तिथल्या पेशंटचे व्यक्तीमत्व विकासाचे वर्ग घे. स्वतःच्या अनुभवांची खान उघडी कर त्यांच्यासमोर. होऊ शकतं तुझ्यापासून प्रेरणा घेऊन काही मानसिक रुग्ण त्यांच्या कोशातुन बाहेर पडायचा प्रयत्न करतील."
"अगं बस. तिला तु काय बोलतेय ते समजू तर दे."
"मला फक्त इतकंच सांगायचं आहे की अशी लोकं तुला पदोपदी भेटतिल तेव्हा स्वतःच मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नकोस."
"हो नक्कीच."
"आणि मला तुमची ती कोर्स जॉईन करायची आयडिया आवडली. मी आजच जाऊन माहिती काढतो."
या प्रसंगानं अरुच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं. कोर्स जॉईन केल्यावर ती (मानसिक स्वास्थ्य)मेंटल हेल्थ विषयी जागृती अभियान चालवणाऱ्या काही संस्थांसोबत जुळली.  ती आणखी व्यस्त झाली. कोण काय म्हणतं? का म्हणतं? याकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळत नव्हता. रिहॅब सेंटरमधे ती वर्ग घेऊन यायची तेव्हा तिच्याजवळ इतक्या गोष्टी असायच्या सांगायला आणि अर्थातच ऐकायला रवी सज्जच असायचा. तो तिची खूप काळजी घ्यायचा. सकाळी ती कॉलेजला जायची तेव्हा तिचा टिफिन पॅक करून देणं,  देण्यापासून ति दुपारी पराठा शॉपमधे परतली की तिला आधी जेवण वाढून देणं. रिहॅब सेंटरला वर्गासाठी घेऊन जाणं. परत आणणं. सगळं तो मनापासून करत होता. पावसाळा सुरु झाला.
"आज मी कॉलेजला जाणार नाही आणि तु शॉपमधे." खिडकीबाहेर बघत अरु म्हणाली.
"काय विचार काय आहे मॅडमचा?"
"बाहेर बघ ना किती मस्त वातावरण झालंय पावसानं. आपण चौघ खडकवासला जाऊ."
"तुम्ही दोघ जा. आम्ही नोकरदार. सुट्टी नाही मिळायची आम्हाला."
"हे तुमचं नेहमीचच." अरुनं जीभ चावली.
"असं?" राधानं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
"सॉरी."
"अगं जा तुम्ही दोघं."राधा तिला लाडात म्हणाली.
मग अरुनं कॉलेजच्या सरांना, तिचं आज यायला जमणार नाही असा मेसेज केला आणि रवीनं पराठा शॉपमधे कळवलं तो उशिरा येईल ते. ते दोघंच बाईकनं निघाले खडकवासल्याला अन जाता जाता सिंहगडवर जाऊन पोहाचलें. अरुला उंचीची भीती वाटत होती. तिनं डोळे घट्ट मिटले आणि रवीला दोन्ही हातांनी पक्क पकडलं.
"मॅडम डोळे उघडा आणि सोडा आम्हांला. आपण आलो गडावर."
"अरे हो. किती सुंदर दिसतंय ना सगळं पावसानं न्हाऊन निघाल्यावर."
"हो."
थोडावेळ फिरल्यावर दोघं एका ठिकाणी चहा प्यायला बसले. अरु मंद मंद स्मित करत रवीला पाहु लागली.
"काय झालं."
"उंहू, झालं नाही होतंय."
"म्हणजे, तब्येत ठीक नाही वाटत का? परत जायचं का आपण?"
"नाही रे." त्याचा हात पकडून ती म्हणाली, "तुला किस करायची इच्छा होतेय.''
"माझी मस्करी करतेयस तु."
"अजिबात नाही. महाराजांच्या गडावर आहेस म्हणून वाचला तु."
"काय?"त्याचा चेहरा अगदी गोरा मोरा झाला.
"आपण उद्याच लग्न करूया."
"ए बस. हार्ट अटॅक येईल मला. पन्नासावा वाढदिवस आहे पुढल्या महिन्यात माझा."
"नाही खरंच आपण उद्या लग्न करु. मी आता मानसिक रित्या त्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे."
राधा आणि अतुलने त्यांचं आदर्श पद्धतीने मंदिरात लग्न लावून दिलं. व्हाट्सअप व्हिडीओ कॉल वरून अरुच्या आईबाबा, महेश, रियानं त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
त्यांचं वैवाहिक जीवन सुरु झालं. कधीकधी अरुला मूडस्विंगचा त्रास व्हायचा. पण आता तिला आणि रवीला हे होईलच आणि तेवढा वेळ गेला की मूडही ठीक होईल हे कळायचं. म्हणून ते फक्त असं झालं की वहीत नोंद करून ठेवायचे. म्हणजे सायकिऍट्रिस्टला भेटायला गेलं की हा डाटा दाखवून त्यानुसार ती ट्रीटमेंट देई. अरुचा समुपदेशनचा अभ्यास वर्ग पूर्ण झाला. परीक्षा झाली. ती चांगल्या मार्कात पास झाली. एका नावाजलेल्या रिहॅब सेंटर मधे अरुनं शिकाऊ समुपदेशक म्हणून काम करणं सुरु केलं. तिकडे रवीचं पराठा शॉपचा चांगला जम बसला. सकाळी 7 ते 9 आणि दुपारी ऑफिसचे लंच ब्रेक झाले की त्याला बसायचीही उसंत मिळत नव्हती. त्याची दगदग पाहुन आता पुढे आपणच आपली जबाबदारी घ्यायचं तिनं ठरवलं.
"यापुढे कुठेही मी एकटीच जात जाईल. तुम्ही आपापली कामं सोडून माझ्या मागे धावायची गरज नाही. जिथं जाईल तिथं जायच्या आधी आणि पोहोचल्यावर तुम्हाला मेसेज करत जाईल." राधा, अतुल आणि रवीला तिनं तिचा निर्णय सांगितला.
"अगं पण... " राधा म्हणाली.
"प्लीज... "
"मला अरुचा निर्णय पटतोय." अतुल म्हणाला.
"मी पण तिच्याशी सहमत आहे."रवी म्हणाला. आणि अरुचं आत्मनिर्भर आयुष्य सुरु झालं. रवीनंही खबरदारी म्हणून अरु समुपदेशन करायला जात असलेल्या रिहॅब सेंटरच्या ऍडमिनला अरु तिथं गेल्यावर आणि तिथून निघाल्यावर कॉल किंवा मेसेज करायला सांगितलं.
"हॅल्लो, आज अरु समुपदेशन करायला सेंटरवर आली नाही. मी कॉल केला तर ती उचलत नाहीये."
"काय?"
"हो, म्हणूनच तुम्हाला कॉल केला."
"थँक्यू ! मी बघतो घरी जाऊन."
रवीनं अरुला फोन लावला. 3-4 वेळा लावला पण तिनं उचलला नाही. आता त्याला तिची खूप काळजी वाटू लागली. थोडया वेळात येतो असं स्टाफला सांगून पराठा शॉपच्या बाहेर पडला. त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं.
"अरुनं तयारी तर केली होती रिहॅबला जायची. मग पोहोचली का नाही? कुठे गेली असेल? काय करत असेल?"

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 10

स्वीकार भाग 9 इथे वाचा
"अरु दार उघड." राधानं आराधनाला आवज दिला.
"अरु मावशी बाहेर ये प्लिज."
"बाळा असं नको करु."
"अरु प्लिज ऐक आमचं."
सगळे बोलले पण अरुने दार उघडले नाही. तिनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करु नये हिच भीती सगळ्यांच मन खात होती. अर्णव रेस्टॉरंट रिसेप्शन वर रूमची डुप्लिकेट चाबी घ्यायला गेला.
"मी गॅलरीतुन आत जातो आणि दार उघडतो."अमन म्हणाला.
"अमन तु जा. दार उघडू नकोस. लपून फक्त अरुवर लक्ष ठेव."
"का?"
"मला वाटतं की दार तिनं स्वतः तिच्या इच्छेनं उघडावं.  अन बघ ती उघडनार दार. ती स्वतःच येईल बाहेर. तिला थोडा वेळ हवा." पूर्वा म्हणाली.
"अरु का गं अशी वागतेस? तु यांचं दिवसाची वाट पाहत होतीस ना. रवी बोलला आज त्याच्या मनातलं. तुही बोल. मोकळी हो." राधा अरुला म्हणाली.
रवीला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, "मला वाटतं मी खूप दुखावलं तुला अरु. मोठी चूक केली. मला माफ कर. मी परत कधीच तूझ्या समोर नाही येणार. जातो मी." तो तिथून जाऊ लागला. तोच अरुनं दार उघडलं.
"रवी थांब." अरु म्हणाली, "मला काही कळत नाही काय होतंय? खूप भीती वाटतेय. हे सगळं स्वप्न आहे. मी जागी होईल अन स्वप्न भंगून जाईल." अरु खाली बसून रडू लागली.
"अरु रडायचं आहे रड. त्यात काहीच गैर नाही."पूर्वा तिला म्हणाली, "रवी आराधनाला आत ने." रवी आणि राधा अरुला हात धरून आत घेऊन गेले.
"तुम्ही लोकं जा बर्थडे पार्टीला."
"आई असं कसं म्हणतेय तु? आराधनाला सोडून नाही जाणार आम्ही."
"अरे तिला शांततेची गरज आहे. समजून घे फुलराणी. आम्ही येतोच थोडयावेळात अरुला घेऊन."
"ओके आम्ही बागेत बसतो मग. तुझं झालं की सांग. मॅनेजरला बाहेरच डिनर लावायला सांगेल."
"गूड."
पूर्वानं रूम सर्व्हिसला फोन करून निंबू शरबत आणायला सांगितलं. ती आराधना जवळ गेली. "अरु तुला जे योग्य वाटेल ते कर. कोणाचीही जोर जबरदस्ती नाही. फक्त ताण घेऊ नकोस." वेटर निंबूशरबत घेऊन आला, "हे शरबत घे आणि आराम कर. तु म्हणशील तर इथे बसतो आम्ही नाहीतर बाहेर जातो."
"नाही इथेच बसा माझ्याजवळ." निंबूशरबत पिऊन ती शांत बसली.
"मी येतो बाहेर काय चाललं ते पाहून." रवी बाहेर जायला उठला.
"थांब." अरुनं त्याला थांबवलं," मला बोलायचं आहे तूझ्याशी."
"हो तुम्ही बोला. मी आणि राधा बघते बाकीच्यांच काय सुरु आहे ते." पूर्वा आणि राधा बाहेर गेल्या.
"सॉरी."
"कशाला."
"मी असं रिऍक्ट केलं म्हणून."अरु रवीला म्हणाली, "पण हेच माझं सत्य आहे. हे माझे बदलते मूड्स माझ्या मृत्यूसोबतच संपतील."
"अरु प्लिज असं बोलू नकोस."
"हो पण हे खरं आहे. होऊ शकतं पुढे चालून तुला माझ्या अशा मूड स्विंग्जचा कंटाळा येईल. जेव्हा आजूबाजूची लोकं माझा अस्वीकार करतील, तुला एका असायलम मधून आलेल्या बाईचा नवरा म्हणतील, तेव्हा तु मला सोडून देशील."
"हे काय बोलतेय तु?"
"जे घडू शकतं ते बोलतेय. म्हणून मला वाटतं की तु आधी काही दिवस माझी वागणूक बघ. मला चार लोकात तुझी होणारी बायको म्हणून मिरव आणि नंतरच काय तो निर्णय घे. उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस."
"ठीक आहे तु जे म्हणशील ते."मग थोडा विचार करून तो म्हणाला, " तु माझ्या रेस्टॉरंट मधे काम करशील, माझ्यासोबत दिवसभर राहा म्हणजे तुलाही मला समजून घेता येईल आणि मला तुला... हवं तर काही दिवस मी राधाकडेच राहायला येतो. म्हणजे तुझी संपूर्ण दिनचर्या मला समजेल."
"चालेल."
"Done." रवीनं हात पुढे केला.
"Done." अरुने त्याच्या हातात हात दिला.
फ्रेश होऊन ते दोघं बागेत गेले. डिनर लावलेला होता. रोमँटिक मधुर संगीत सुरु होतं. कोणीही काहीही प्रश्न विचारणार नाही, हे पूर्वानं आधीच सगळ्यांना सांगितलं होतं. त्यामुळे कोणीच काही विचारलं नाही. टेबलवर मेनबत्त्या लावण्यात आल्या. कॅण्डल लाईट डिनर असाच असतो ना. हसत बोलत जेवण झालं.
ट्रिपवरून सर्व आनंदात पुण्याला परतले. अरुनं तिचा पुण्यातच राधासोबत राहायचा आणि रवीबाबतचा निर्णय महेशला सांगितला.
"तुझ्यावर मी माझं मत लादणार नाही. पण प्लिज यावेळी निराश होऊन परत काही उलट सुलट करु नकोस. मी माफ नाही करु शकणार स्वतःला."
"नाही दादा. तसं होणार नाही. काही असलंच तर मी सांगेल तुला आणि हा स्मार्ट फोन आहेच ना. मी रोज व्हाट्सऍप व्हिडीओ कॉल करून बोर करत जाईल तुला."
"चालेल गं अरु." रिया म्हणाली, "महेशचा खूप जीव आहे तूझ्यात. काळजी घे स्वतःची."
"हो." अरुनं रियाला मिठी मारली, "तु दिलेला ड्रेस खूप सुंदर आहे. थँक्यू."
"तुझा हक्क आहे तो. अजून खूप काही द्यायचं आहे तुला. चल लंडनला आमच्याकडे."
"आता नको."
"ठीक आहे."
10 तारखेला रवीच्या रेस्टॉरंटच उदघाट्न झालं. महेश, रिया, अर्णव आणि अरुचे आईबाबा लंडनला परत गेले. अमनची सुट्टी संपली. तो कॉलेजला परत गेला. त्यानी आणि फुलराणीनं बोलून ठरवलं की लग्न तो नेव्ही ऑफिसर झाल्यावरच करेल. जे योग्यच आहे आणि फुलराणीला पुस्तक लिहायला नवीन विषय सुद्धा मिळाला होता, "मनोरुग्णाचा स्वीकार!" पूर्वानं अरुची सगळी जबाबदारी पुण्याच्या एका सायकीऍट्रीस्टला सोपवली आणि ती फुलराणीसोबत दिल्लीला परत गेली.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 9

स्वीकार भाग 8 इथे वाचा 

 स्वीकार भाग 10 इथे वाचा 

रवीनं माथेरानला 2 दिवस राहण्यासाठी रिसॉर्टमधे बंगलो सारखं डुप्लेक्स बुक केलं. रिसॉर्टची बाग सुंदर रंगींबेरंगी फुलांनी जनु नटली होती. सगळ्यांना आवडली जागा. आजूबाजूला पेरूची, आंब्याची झाडं पाहून पोरांनी दुसऱ्या दिवशी पेरूंचा समाचार घ्यायचं ठरवलं. रात्री छान जेवण आणि गप्पा टप्पा झाल्या. जून महिन्याचा पहिलाच आठवडा. रिमझिम पावसाची एक सर आली अन वातावरण प्रफुल्लित करून गेली. यंग जनरेश म्हणजे फुलराणी, अमन आणि अर्णवच मन होतं की रात्री बारा वाजता आराधनाला हॅपी बर्थडे करून सरप्राईज द्यायचं. पण पूर्वानं त्यांना नकार दिला. अरुच्या मानसिक आरोग्यासाठी पूर्ण झोप होणं महत्वाचं होतंच पण तिची दिनचर्या पाळल्या जाणं ही महत्वाचं. म्हणून मग सगळ्यांनी पहाटे लवकर उठून हॉटेलच्या बागेतील फक्त फुलं आणून तिच्या बेडजवळ ठेवायची, आणि माथेरान फिरून आल्यावर संध्याकाळी पार्टी करून वाढदिवस साजरा करायचं असं ठरलं. सर्वांनी तसंच केलं.
सकाळी 6 चा अलार्म वाजला तशी अरु उठून बसली. समोर बघते तर गुलाबाची, चाफ्याची, जाई जुईची, आणि इतर रंगीं बेरंगी फुलंच फुलं. तिला वाटलं आपल्याला भ्रम होतोय म्हणून तिनं डोळे चोळले. तरीही फुलं तिथंच.
"अशी काय बघतेस ! मुलांनी तुझ्यासाठी स्वतः फुलं तोडली आणि बुके बनवले."
"का? "
"आज वाढदिवस आहे तुझा. हॅपी बर्थडे डिअर." राधा तिला ओंजळभर चाफ्याची फुलं देऊन म्हणाली. तिनं त्यांचा सुगंध घेतला.
"thankyou राधा." तिचे डोळे भरून आले, "तु नसती तर माझं काय झालं असतं?"
"तो विचार करायचा आजचा दिवस नाही." पूर्वा म्हणाली, "हॅपी बर्थडे. आज फक्त छान छान विचार करायचा."
"हो गं अरु."
"माझी द्वाड पोर येईलच इतक्यात. फ्रेश व्हा. चहा घेऊन ट्रेकिंगला जाऊ."
ट्रेकिंगसाठी सगळ्यांचा ड्रेसकोड सारखाच ठेवलेला. ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट. अरु तयार होऊन बाहेर आली.
"काय मस्त दिसतेय गं तु." फुलराणीनं लगेच अरूचा फोटो काढला,"तु ना जीन्स टी शर्टच घालत जा."
"हो खरंच की, महेशची बहीण नाही, मुलगी दिसतेय तु."रिया म्हणाली.
"काहीही. मी इतका म्हातारा दिसतो का"
"नाही रे, रिया म्हणतेय की अरु तरुण दिसतेय."आराधनाची आई म्हणाली. अरूचा चेहरा लाजेनं लाल झाला. तिनं आईला मिठी मारली.
"खूप सुंदर दिसतेय माझी पोर. अजूनही लग्नाचा विचार केला तर मुलांची रांग लागेल."
"बस ना गं."
बडबड आणि हसण्याचा आवाज ऐकून रिसॉर्ट मॅनेजरसोबत, 'अरुच्या बर्थडे पार्टी' बाबत चर्चा करत असलेल्या रवीची नजर तिकडे वळली आणि जाऊन अरुवर खिळली. त्याला 21 वर्ष आधीच्या आराधनाची झलक तिच्यात दिसली. आजही तशीच, तीच अंगकाठी... तोच अवखळपणा. त्याच्या मनात वंदना विटणकर यांचं मोह. रफींनी गायलेलं गाणं वाजू लागलं.
"तुझे रूप सखे, गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा गं ध्यास जडे
हा छन्द जीवाला लावी पिसे....."
4 वाजेपर्यंत मंडळ दिवसभर फिरून, हल्ला गुल्ला करून दमून भागून रिसॉर्टमधे परतलं. फ्रेश होऊन जरा पेंगलं. अरुचे आईबाबा तब्येतीमुळे रिसॉर्टमधेच थांबले होते. अरुला आईच्या हातचे बेसनलड्डु खूप आवडायचे. म्हणून आईने रिसॉर्ट मॅनेजरशी बोलून स्वतःच्या हातानं वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून बेसनलड्डू बनवले.
रात्रीचे 7 वाजले. बर्थडे पार्टीची वेळ झाली. सगळे रिसॉर्टच्या पार्टी हॉलमधे जमले. रियाने अरुसाठी वाढदिवसाला घालायला सुंदर अनारकली भेट दिली. राधाने अरुला छान तयार करून आणलं. पिस्ता कलरच्या प्लेन सिल्क अनारकली ड्रेसमधे अरूचा गौर वर्ण अजून निखळला. कानातील खळ्यांचे डूल जणू आकाशातील तारे आणि मानेवरून खाली मोकळे सोडलेले केस म्हणजे आभाळ...रवीच्या मनात आलं. तिला पाहून त्याचं मन परत गाऊ लागलं,
"तुझे रूप सखे, गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा गं ध्यास जडे
हा छन्द जीवाला लावी पिसे....."
"फक्त पाहणारच की काही करणार सुद्धा." महेश रवीला म्हणाला.
"असं काहीच नाही दादा. मी बस... "
"अजूनही लपवशीलच मनातलं. ठीक आहे लपव."
"नाही. मी योग्य वेळेची वाट पाहतोय."
"पाहा पण एक लक्षात ठेव फक्त हे आठच दिवस आहेत तूझ्याजवळ वाट पाहायला. मी लंडनला जातांना अरुला घेऊन जाणार आहे."
केक हॉलमधे आला. कट झाला. अरुनं आईबाबाला केक भरवला. ती राधाला केक भरवायला पुढे झाली. तो रवी तिच्यासमोर एका  पायावर बसून तिला म्हणाला,
"एकटा फिरून फिरून थकलोय मी, माझी सहचरणी बनशील?
आयुष्याच्या सेकंड इंनिंगमधे सोबत हवी असतेच, माझी जीवनसंगिनी होशील?
शब्दांनी सगळंच ओळखता येतं, सांगता येतं बोलता येतं, तु त्यांचा आसरा न घेता, माझ्या मनातील गुपित ओळखशील?" रवी काय बोलतोय, ती काय ऐकतेय? अरुला काहीच कळत नव्हतं. तो बोलतच होता, "अरु आपण एकमेकांसाठीच जन्माला आलो. पण आपण आपल्या भावना एकमेकांसमोर कधी व्यक्तच केल्या नाही. कदाचित त्याचीच शिक्षा म्हणून आपलं 21 वर्षांचं आयुष्य आपल्यासाठी एक वाईट स्वप्न बनलं. मी तुला माझ्या भावना वेळेवर सांगितल्या नाहीत. मला माफ कर."
अरुचे डोळे भरून आले. तिला राहवलं नाही. रवीला कडाडून मिठी मारून ती हुंदके देऊन रडू लागली. रवीही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचं सांत्वन करु लागला. दोघांना जणू जागेचा, त्यांच्या वयाचा, आजूबाजूच्या लोकांचा, सगळ्यांचा विसर पडला. त्यांच्यासोबत इतरही सर्व रडू लागले. हे पाहून अमनचा चेहरा पडला. त्याला सिरीयस वातावरण अजिबात आवडत नव्हते. म्हणून तो मोठ्यानं म्हणाला, "लहानांनी आणि वृद्धांनी आपले डोळे बंद करावे नाहीतर एकमेकांना मिठी मारावी. तसही आज मुन्नाभाईच्या जादूच्या झप्पीचा दिवस आहे."
हे ऐकून सर्वांना हसू आलं. अरु आणि रवीही दूर झाले आणि  हसू लागले.
"आयुष्याच्या सेकंड इनिंग बद्दल काय विचार आहे? लग्न करशील माझ्याशी?"रवीनं अरुला विचारलं.
अरुला धडधड होऊ लागलं. हाताला घाम फुटला. हे सर्व किती दिवस टिकेल? आपल्याला परत मॅनियाचा अटॅक आला म्हणजे? आपण डिप्रेशनमधे गेलो तर? तिचं मन तिला प्रश्न करु लागलं. ती काहीच न बोलता बंगलोच्या रूममधे धावत गेली आणि तिनं स्वतःला आत बंद करून घेतलं.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 8

स्वीकार भाग 7
पहाटे पहाटे बेल वाजली. राधाला समजलं की रवी मिनीबस  घेऊन आला असेल. तिनं मुद्दाम अरुला दार उघडायला सांगितलं. अरुनं दार उघडलं. समोर रवी ! क्षणभर दोघांनी एकमेकांना पाहिलं. आधी दोघांनी एकमेकांची बोलायची वाट बघितली. मग राधाला हॉल मधे येतांना पाहून अरुच बोलली, "हाय!''
"हाय !"
"कसा आहेस?"
"छान ! तु?"
"मी छान आहे."
"आज सर्व गोष्टी दारातच होणार आहेत वाटतं." राधा म्हणाली.
"अरे सॉरी आत ये."
"नाही आला तरी चालेल. बॅग दारातच ठेवल्या आहेत. जा घेऊन खाली दोघेही."
"मी सुद्धा."
"मला वाटतं तुम्ही दोघंच आहात दारात. आणखी कोणी आहे का तिकडे?" राधा मिश्किलपने बोलली.
"पुरे राधा."अतुल घराची चाबी घेऊन आला, "तिचा म्हणण्याचा अर्थ आहे. गाडीत जाऊन बसा. आम्ही सर्व लॉक करून येतो पाच मिनिटात."
रवी बॅग घेऊन पुढे चालू लागला आणि अरु त्याच्या मागे. "बाकी मंडळ म्हणजे फुलराणी, तिची आई पूर्वा आणि अमन कुठे आहे?"
"ते महेश दादाकडे गेले मॉर्निंग वॉक करत."
"ओके."
"नक्कीच बर्थडे प्लान करायला गेले असतील."रवी स्वतःशीच पुटपुटला.
"काही म्हटलं का?" अरुनं विचारलं.
"नाही, सहजच मनात आलं. सगळं किती बदललं आहे. आपण लहान होतो तेव्हाच जग आणि आताच...."
"तु हा सर्व बदल होतांना बघितला तरी असं म्हणतोय. मग मी काय म्हणावं."
"सॉरी."
"इट्स ओके." अरुच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रवीला वाटलं जाऊन अरुला मिठीत घ्यावं आणि म्हणावं, मी आहे ना सोबत मग कशाचीच काळजी करु नको. पण तो तसाच तिला डोळ्यांच्या कडा पुसत बघत उभा राहिला.
"सगळं घेतलं ना आठवणीने?" अतुल राधाशी बोलतच खाली आला, "अर्ध्यात गेल्यावर म्हणायचं नाही हे राहिलं ते राहिलं."
"घेतलं ना, असा काय करतोय? इतका त्रास देते का मी?"
"अगं तसं नाही... "
राधा अतुलची चाहूल लागताच अरु गडबडीत मिनीबसमधे जाऊन बसु लागली आणि तिचा पाय मिनीबसच्या पायरीवरून घसरला झाला. ति खाली पडणार तो रवीनं तिला पकडलं. तिनंही रवीचा हात घट्ट पकडला. राधा धावत त्यांच्याजवळ गेली.
"अगं ठीक आहेस ना तु?"
"हो हो." अरुनं रवीचा हात सोडून दिला, "पाय माहित नाही कस काय घसरला."
"जेव्हा घसरायला हवा होता तेव्हा घसरला नाही. म्हणून आता घसरतोय तो." अतुल म्हणाला.
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही. लक्ष नको देऊ त्याच्याकडे." राधा गोड हसत म्हणाली, "चल रवी. ते लोकं वाट पाहत असतील आपली."
बस महेशच्या फ्लॅटसमोर आली. सर्व वाटच पाहत होते.
"हाय रवी. कसा आहेस?" महेशनं रवीला विचारलं.
"छान ! तु कसा आहेस दादा."
"मी छान, पण अरु ठीक होतेय हे पाहून अगदी 101% छान झालोय बघ."
"हो." रवीनं अरुकडे बघितलं. ती आईबाबासोबत गप्पा मारत होती. महेशचा 16 वर्षाचा मुलगा व्हिडीओ शूट करत होता.
"हा माझा मुलगा अर्णव आणि ही माझी पत्नी रिया."
"हाय, हाय" रवीनं दोघांना हाय केलं.
"मग व्यवसाय की नोकरी सुरु आहे." महेशनं विचारलं.
"करिष्मा सोसायटीजवळच्या खाऊगल्लीत एक रेस्टॉरंट रेंटवर घेतलं. 10 तारखेला उदघाट्न करु."
"अरे वा, म्हणजे चारच दिवसांनी."
"हो."
"नाव काय ठेवलं आणि मेनू काय ठेवणार आहेस?"
"पराठा शॉप, 10 प्रकारचे पराठे आणि सकाळी 7 ते 10 उपमा, पोहा, नागपुरी चणा पोहा हे नाश्त्याचे पदार्थ आणि चहा कॉफी."
"छान !'' महेशला खूप आनंद झाला रवीचं पुढलं प्लानिंग ऐकून. राधा आणि अतुलनं जेव्हा महेशला रवी आणि अरुचं लग्न करून द्यायचे आहे हे सांगितलं. तो काळजीत पडला. कारण मागील 8 वर्षापासून रवी जिप्सी सारखा जगतोय हे त्याला त्याच्या मित्रपरिवाराकडून ऐकायला मिळत होतं. म्हणून अरुला सोबत घेऊन जायच्या उद्देशानेच महेश भारतात परतला होता. पण रवीला भेटल्यावर त्याला अरुची काळजी करायची गरज नाही हे समजलं.
"ए चला अंताक्षरी खेळूया का आपण?" अर्णवनं त्याचा विचार मांडला.
"हो हो चला खेळू. सर्व पुरुष मंडळी एक टीम आणि आम्हा बायकांची एक टीम." फुलराणी म्हणाली.
"पण बाबा म्हणतात, लग्न झालेल्या मुलीला बायका असं म्हणतात. तु तर माझ्यापेक्षा लहान दिसते आणि भारतात बालविवाह कधीचा बंद झाला. मग तु बायका कशी?" अर्णवचा प्रश्न.
"चला फुलराणीच्या टक्करचं कोणीतरी भेटलं." अमन फुलराणीला चिडवत म्हणाला.
"ए गप बसा आणि अंताक्षरी खेळा. मी सुरु करते."परत कोणी काही प्रश्न विचारू नये म्हणून ती तिचं आवडतं, हम साथ साथ है सिनेमाचं गाणं म्हणू लागली
,"ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ I LOVE YOU." शेवटचे तीन शब्द ती अमनला पाहून म्हणाली. तसा त्यानं लाजतच हाताने चेहरा झाकला.
अंताक्षरी छान रंगली. इकडे अरु आणि रवीचं एकमेकांना लपून लपून बघणं सुरु होतं. जणू ते दोघंच होते बसमधे. बाकीचे नव्हतेच. गाण्याचा आवाज, गोंधळ कशाचीच त्यांना बाधा नव्हती.
"ए आराधना कुठे लक्ष आहे तुझे?"
"हो ना किती वेळचा आवज देतेय."
"सॉरी काय झालं?"
"आपल्यावर म आला आहे. छानसं गाणं म्हण ना."
"हो का, सांगते." अरुला तिचं आवडतं गाणं आठवलं,
"मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है|पर सामने जब तुम आते हो, कुछ भी केहनेसे डरता है. ओ मेरे साजन,  साजन साजन."
रवीनं गुपचूप गाणं मोबाईलमधे रेकॉर्ड करून घेतलं. बस थांबली. "काय झालं ड्रायवर भाऊ?"
"लोणावळा आलं साहेब."
"आलं का? बरं झालं. नाहीतर आज फुलराणीचे गाणे ऐकूनच पोट भरावं लागेल असं वाटलं मला." अमन.
"सासूबाई याला जेवण नाही द्यायचं." फुलराणी चिडली.
"पूर्वा तु आमच्यासोबतच राहायला ये कायमची पुण्याला. ही दोन लेकरं माझ्या कडून सांभाळणं होणे नाही." राधा.
"ए थांबवा तुमचं आणि सांगा आधी जेवण करायचं की पाण्यात मज्जा?"
"जेवणच करु अतुल. औषधं घ्यायची असतील अरुच्या बाबांना." पूर्वाचा इशारा अतुलला समजला. जेवण करून अरुला दुपारचं औषध द्यायचं होतं. अरुचा एकही डोज चुकु नये याची ती पूर्ण काळजी घेत होती.
जेवण झाल्यावर अरुचे आईबाबा सोडून इतर सर्व मंडळ पाण्यात गेलं. फेब्रुवारी महिन्याची दुपार असल्यामुळे इतकं काही ऊन नव्हतं. पण तरीही पाणी मस्त वाटत होतं. अरु मात्र बाहेरूनच सगळ्यांना मजा करतांना बघू लागली. रवी ड्रायवरला काही सूचना देऊन आला. तो अरुला एकटं उभं पाहून म्हणाला,
"तु एकटी काय करतेय इथे. चल पाण्यात. छान वाटेल तुला."
"नको मी इथेच बरी आहे."
"अरु ये रवीसोबत. खूप मज्जा येतेय."
"नाही दादा मला खूप भीती वाटतेय."
"रवी आन तिला हात पकडून."महेशने हुकूम सोडला.
मग काय रवी तिचा हात पकडून तिला पाण्यात घेऊन गेला. अरु त्याला पाहतच राहिली. पाण्यात भिजताच तिच्या अंगातला सगळा त्राण निघून गेला.
पाण्यात खेळल्यावर सगळे खूप थकले आणि बसमधे बसताच झोपीच्या आहारी गेले. संध्याकाळी 4:30 ला मिनीबस नेरळला पोहोचली. नेरळवरून 5 वाजताच्या टॉय ट्रेनने माथेरानला गेले. नेरळ ते माथेरान दोन तासांचा प्रवास नयन रम्य असं निसर्ग सौंदर्य पाहत लवकरच संपला.
"मामाश्री खूप खूप धन्यवाद टॉय ट्रेन साठी." अमन रवीला म्हणाला.
"हो खरंच खूप मज्जा आली." अर्णव म्हणाला.
"हो ना, हे सर्व असं परिवारासोबत अनुभवायला नशीबच लागतं." रिया बोलली.
"अरे बस, अजून दोन दिवस सोबत आहोत. या दोन दिवसांचं नियोजन आवडलं की मग मनभरून एकसाथ तारीफ कराल  माझी." रवी म्हणाला.
अरुनं मनोमन रवीला थँक्यू म्हटलं.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 7

स्वीकार भाग 6 इथे वाचा 

स्वीकार भाग 8 इथे वाचा
अतुल मिटिंगनंतर सरळ ऑफिसला गेला आणि फुलराणी वनश्री सोबत कामाचं बोलायला गेली. राधा आणि पूर्वा अरुला पाहायला घरी गेल्या. ते मिटिंगसाठी आले तेव्हा आराधना झोपून होती. काकू स्वयंपाक करत होत्या. अरु उठली होती. शो केस मधे लावलेले फोटो पाहत होती.
"राधा तु का घरी आणलंस मला?" राधाच्या घरात येण्याची चाहूल लागली.''मी सगळ्यांसाठी फक्त त्रासदायक आहे गं.
"अरु तु ओळखलं मला. म्हणजे तु ठीक होतेय आता. हो ना पूर्वा."
"हो खरंच."
"पण मला नाही व्हायचं ठीक. राधा तु का समजून घेत नाहीस. मला त्या दिवशीच सगळं आठवलं जेव्हा मी पागलखान्यात रवीला पाहिलं. मला वाटलं मी गोंधळ घातलेला पाहून तुम्ही मला घरी आणणार नाही. पण तुम्ही आणलं. इथंही मी किती त्रास दिला, सोसायटीतुन बाहेर पडायची वेळ आली तुमच्यावर पण तुम्ही हार नाही मानली. का?"
"कारण मला तु हवी आहेस. मला माझी 21 वर्ष पूर्वीची मैत्रीण हवी आहे."
"पण माझं मानसिक संतुलन खूप बिघडलं आहे. मी तशी कधीच नाही होऊ शकत आणि झाली तरी हा समाज मला स्वीकार करणार नाही." बेडला टेकून खाली बसून दोन्ही हातात तोंड झाकून ति हमसून हमसून रडू लागली.
"असं काहीच होणार नाही गं. माझ्या पोरीला, फुलराणीला माझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा तूझ्यावर. म्हणून तर माझी सगळी कामं सोडून मी इथं आली. राधा तिचं काम घरून (वर्क फ्रॉम होम) करतेय." पूर्वा अरुच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "पाणी पिणार."
"हो."
"काकू एक गिलास पाणी आणा."
काकूनं भीत भीतच राधाच्या हातात पाणी दिलं. राधानं अगदी रागात तिला पाहिलं.
"पण तुम्ही रवीला का यात ओढताय?"
"कारण मला कळलंय की तुझं... " राधा तिला सांगणारच होती की तिला रवी आवडायचा हे सगळ्यांना कळलं आहे. पण पूर्वाने सांगू नको असा इशारा केला. कारण अरुला हे सगळं तिनं बरं व्हावं म्हणून केलेलं प्लॅनिंग वाटेल. ज्यामुळे तिचं आणखी जास्त मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता होती.
"काय माझं?"अरुनं तिला प्रश्न केला.
"तुझं त्याच्यासाठी ठीक होणं गरजेच आहे. रवीची पहिली चॉईस तु होतीस."
"काय?"
"हो, पण परिस्थितीमुळे तो हे बोलायला धजावला नाही."
"असं का झालं? तो का बोलला नाही मला?"
थोडावेळ शांतता पसरली.
"पण रवीनं तर लव्ह मॅरीएज केलं होतं ना निधीसोबत."
"त्यांचा 8 वर्ष आधी निधी सोबत घटस्फोट झाला."
"काय?"
"मला हे आता आताच निधीकडून माहित झालं. नंतर रवीच्या डोळ्यातही मला ते दिसून आलं. म्हणून म्हटलं माझ्यासाठी माझ्या स्वार्थासाठी, माझ्या दादाला एक नवीन आयुष्य देण्यासाठी मला तु हवी आहेस." अरुला हाताने उभं करत राधा पुढे म्हणाली, "माझी साथ देशील?"
अरुने होकारार्थी मान हलवली आणि राधाला मिठी मारली. पूर्वा मनोमन खूप आनंदीत झाली. कारण आराधनाला आता जगायला एक हेतू मिळाला. माणसशास्त्रीय भाषेत म्हणाल तर motive मिळालं. आता यापुढे ती स्वतः लवकरात लवकर बरं व्हायचा प्रयत्न करेल.
"मला वाटतं बाकी गोष्टी आपण नंतर आरामात बसून करु." पूर्वा दोघींना म्हणाली, "चला फ्रेश व्हा. आराधना अंघोळ कर. आपण छान जेवू. औषधं घेऊ आणि गप्पा मारू."
"हो चल अरु मी गिझर ऑन करून देते." राधा म्हणाली.
"नको, आज माझं सगळं मीच करेल."
"अगं पण."
"राधा, करु दे तिला. जा अरु." पूर्वाने राधाला थांबवलं.
अरुला बाथरूममधे गेल्यावर थोडं भांबावल्यासारखं झालं की काय कसं करायचं? पण 2 मिनिट शांत उभं राहिल्यावर तिनं केलं सगळं मनानंच.
पूर्वाने फुलराणीला फोन करून घरी घडलेलं सांगितलं. ती खूप आनंदी झाली. लवकरच घरी येतो म्हणाली.
जेवण झाल्यावर पूर्वाने अरुला औषधं दिली. त्यांनी काही पेपर crafting केलं. अरुने खूप सुंदर अशी फुलं बनवली.
"अरु तु अशाच फुलांचा बुके रवीला तो बारावी पास झाला होता तेव्हा दिली होतीस ना."
"हो आणि आताही त्याला देण्यासाठीच बनवतेय." अरुच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. पण पूर्वाला माहित होतं की हे सगळं इतकं सोपं नाही. अजून अरुला खूप गोष्टींवर मात करायची आहे. त्यासाठी पूर्वाने वेळापत्रक पूर्णपने पाळायचं ठरवलं. सोबतच सकाळ संध्याकाळी दोन वेळा आराधनाला योगाभ्यास, प्राणायाम करवून घेणं सुरु केलं. प्राणायाम आणि योगाभ्यास मानसिक आरोग्यासाठी उत्तम औषध. तसेच पुण्याच्या एका नामवंत  सायकिऍट्रिस्टकडे अरुला घेऊन गेली. हळू हळू अरुमधे फरक दिसू लागला. पण म्हणून औषधं बंद केली नाही. कारण आपल्या मेंदूतील काही केमिकल असंतुलित होतात तेव्हा आपलं मानसिक संतुलन बिघडतं. ते केमिकल औषधं संतुलित करतात. म्हणून गरज असेल तेव्हा सायकिऍट्रिस्टनं लिहून दिलेली औषधं आपण घ्यायलाच हवी.
राधाने अरुला स्मार्टफोनची ओळख करून दिली. व्हाट्सऍप चालवायला शिकवलं. अरुच्या बाबाची तब्येत चांगली होऊ लागली. तिच्या भावानं, महेशनं राधाला कॉन्टॅक्ट केला.
व्हाट्सऍप व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारा अरुचं तिच्या आई बाबांशी आणि भावासोबत बोलणं करून दिलं. त्यांना पाहून अरुला भरून आलं.
"मला माफ कर अरु. एका भावाचं कर्तव्य मी पार नाही पाडलं." महेश म्हणाला.
"प्लीज दादा असं नको म्हणू. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या तेव्हाच घडतात जेव्हा घडायच्या असतात." तिच्या वाढदिवसाला म्हणजे एक महिन्याने ते सर्व भरतात अरूला भेटायला येणार असल्याचं तिच्या भावानी सांगितलं.
15 दिवस गेले. अरुला खूप छान वाटू लागलं. एका संध्याकाळी योगाभ्यास झाल्यावर अरु राधाला म्हणाली,
"मला निधीला भेटायचं आहे. तिच्याशी बोलल्यावरच मी रवीला भेटेल."
राधानं पूर्वाकडे पाहिलं. "हो नक्कीच भेटू आपण तिला." पूर्वा म्हणाली. त्यांनी निधीला कळवलं ज्यासाठी त्या आधीच रेडी होत्या. त्यांची वैशालीत मस्त डोसा पार्टी रंगली. निधीनं  तिच्या 15 वर्षाच्या मुलीला, निशाला सोबत आणलं होतं.
"खरं सांगू का अरु तु अगदी तशीच आहेस, जशी जीवनसंगिनी तो माझ्यात शोधत होता." निधी अरुचा हात हातात घेऊन म्हणाली, "कदाचित मी त्याला प्रपोज केलं नसतं तर पुढे चालून त्यानं तुला नक्कीच प्रपोज केलं असतं. त्यामुळे असं वाटतं मी मधात आले तुमच्या. म्हणून आमचा संसार टिकला नाही ना त्या संसार वेलीवर एकही फुल उमललं."
"अगं पण माझ्या मनात तसं काहीच नव्हतं हं रवीबद्दल. पण एक मित्र म्हणून आवडायचा म्हणून मन दुखावलं नसतं त्याचं." अरु खोटं बोलतेय हे सगळ्यांना ओळखू येत होतं.
"असो, त्यानं तरी कुठे त्याचं प्रेम व्यक्त केलं? पुण्यातच असून एकदाही भेटायला आला नाही अरुच्या." अतुल म्हणाला.
अरूचा चेहरा उतरला. राधाने अतुलला नजरेनंच दटावलं.
"तसं काहीच नाही. डॉक्टर लीलानं सांगितलं अरुला जास्त ताण नाही द्यायचा म्हणून तो नाही आला तुला भेटायला."
"असू दे." अरु खोटं खोटं हसून म्हणाली. पण तिलाही मनातून वाटत होतं की, 'रवी का आला नाही भेटायला? पण मीही रवीवरच प्रेम करायची आणि ते मनातल्या मनात दडवून ठेवलं म्हणूनच माझी मानसिक अवस्था बिघडली असं यांना समजलं तर काय वाटेल यांना? नको असं नको व्हायला. म्हणून मला धीरानं काम घ्यायला हवं. मी वाट पाहीन रवीची.' ती स्वतःशीच बोलली.
अमन सुट्टी घेऊन खास अरुला भेटायला आला. राधाचीच झेरॉक्स कॉपी. अरुला त्याला भेटून खूप छान वाटलं. नेव्हीच्या खूप रोमांचित गोष्टी त्यानं अरुला सांगितल्या. अरुला पल्लवी जोशीचं आरोहण सिरीयलची आठवण झाली. ती पाहून अरुनं ठरवलं होतं की ती सुद्धा नेव्ही जॉईन करेल. खूप स्वप्न रंगवली होती नेव्हीबद्दलची तिनं. पण.... असो अमनला नेव्हीत पाहूनच तिला तिचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं.
अरुचे आईबाबा, दादा महेश , त्याची बायको रिया आणि मुलगा अर्णव सर्व पुण्याला आले. राधाच्या सोसायटीजवळच महेशच्या मित्राच्या खाली फ्लॅटवर त्यांची राहायची सोय झाली. आराधनाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी माथेरानला जायचं ठरवलं. सर्व बंदोबस्त रवीनं केला. आराधना पूर्वीसारखं सर्वांना ओळखू लागल्यावर रवी आणि तिची ही पहिली भेट होणार. जी तिच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी ठरेल.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 6

स्वीकार भाग 5 इथे वाचा 

स्वीकार भाग 7 इथे वाचा
पूर्वा आणि अतुल घरी येताच राधानं सोसायटीची 7 दिवसात फ्लॅट खाली करायची किंवा आराधनाला दुसरीकडे शिफ्ट करायची नोटीस दाखवली.
"हे काय भलतंच. यांना काही अक्कल आहे कि नाही." पूर्वा.
"मग काय आपल्यासोबत मिटिंग न घेता, आपलं म्हणणं ऐकून न घेता अशी कशी नोटीस देऊ शकतात हे? सोसायटी बांधली तेव्हापासून 9-10 वर्ष झाले राहतोय आपण इथे." सोसायटी प्रेसिडेंट मि प्रथमचा नंबर डायल करत अतुल म्हणाला, "मी बोलतो त्यांच्याशी."
"हॅल्लो!"
"हॅल्लो, मी अतुल नगरकर बोलतोय."
"बोला."
"मला सोसायटीच्या मिटिंगमधे बोलायचं आहे. मिटिंग न घेता अशी नोटीस देणं कायदेशीर नाही. आम्ही शांत असतो याचा अर्थ असा नाही कि तुम्ही आमच्यावर काहीही थोपवणार."
"अतुल माझ्यावर कशाला चिडताय. मोती सोसायटी सेक्रेटरी नायकचा डॉगी. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी नाही जाऊ शकलो त्यांच्यापुढे. तरीही मी प्रयत्न करतो उद्या सकाळी मिटिंग घ्यायचा."
"प्रयत्न नाही. मिटिंग झालीच पाहिजे. नाहीतर मी पोलिसात तक्रार करेल."
मि. प्रथमने फोन ठेवला होता.
.............
सर्वांना आपल्या ऑफिसला जायचं असल्यामुळे सकाळी 8 वाजताच मिटिंग घेण्यात आली. तशी माधव सोसायटी खूप मोठी नव्हती. 3 BHK असलेले 150 फ्लॅट त्या सोसायटीत होते. त्यातल्या 80-90 जवळपास फ्लॅट धारकांना तर सोसायटीत काय आणि का चाललं याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. उरलेले हे सेक्रेटरी आणि प्रेसिडेंटला फॉलो करत होते. तेवढेच काय 60-70 फ्लॅटधारक मिटिंगला उपस्थित होते.
मिटिंग सुरु झाली. सेक्रेटरीनं मिटिंगचं कारण सांगितलं,
"तसं तर आम्ही नोटीस दिली पण मि. अतुल नगरकर ऐकायला तयार नाहीत. म्हणून इथेच आपण लाईव्ह वोटिंग करु आणि ठरवू कि पागलखाण्यात 21 वर्ष राहिलेल्या बाईला आपल्या सोसायटीत ठेवायचं नाही."
"हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट पागलखाना हा शब्द आपल्यासारख्या सुशिक्षित पुणेकरांना शोभत नाही. असायलम म्हणा. दुसरी गोष्ट ती वेडी नाही. फक्त मानसिक रित्या खचली आहे."
"जे असेल ते. आम्हाला अशी स्त्री आमच्या सोसायटीत नको आहे."
"कशी स्त्री? असायलमच्या सिनियर सायकिऍट्रिस्टची परवानगी घेऊनच आम्ही आराधनाला घरी आणलं आहे. आणि मि स्वतः ही एक सायकोलॉजिस्ट, PHd सायकोलॉजि   आहे. 24 तास तिच्यावर नजर ठेऊन असते. आज 10 दिवस झालेत. कधीतरी तुम्हा लोकांना तिनं काही त्रास दिला का?"
"अरे वा !" मिसेस शालिनी म्हणाल्या, "आज तुम्ही आणलं एका पागलला सोसायटीत, उद्या आणखी कोणी कोणाला घेऊन येईल. आम्हाला आमची सोसायटी माणसांचीच ठेवायची आहे. पागलांची नाही."
"तुमच्या मैत्रिणी सारख्या पेशंटसाठी पुण्यात खूप संस्था आहेत. हवं तर पत्ते मि देतो."मि. केवल म्हणाले.
अतुलनं डोक्याला हात लावला. राधाला सर्वांचा खूप राग आला. खूप काही ऐकवायचं मन होतं तिचं. पण ते समजून घेणार असले तर उपयोग. डॉक्टर पूर्वालाही कसं समजावू असं झालं. लाईव्ह वोटिंग झाली. अर्थातच जमलेले अर्ध्यापेक्षा जास्त सेक्रेटरीच्या प्रभावात होते. त्यांनी आराधनाला सोसायटीत जागा नाही असंच वोटिंग दिलं. फुलराणीनं सगळं व्हिडीओ रेकॉर्ड केलं.
"तर वोटिंग नुसार मिसेस राधा नगरकर आपल्या मैत्रिणीला इथे ठेवू शकणार नाही."
"नक्की?" फुलराणीनं एन्ट्री घेतली, "एकदा फेरविचार करा."
"तु कोण?"
"मी फुलराणी मुक्त पत्रकार आणि लेखिका आहे आणि मी इथं चाललेलं सगळं माजण रेकॉर्ड केलं आहे. काय आहे ना यु ट्यूब वर माझे जवळपास 5 लाख स्बस्क्रायबर आहेत आणि फेसबुकवर 6 लाखाच्यावर फॉलोवर आहेत. मी तुमचा व्हिडीओ फेसबुक आणि यु ट्यूबवर वायरल केला तर इथं पाय ठेवायला जागा उरणार नाही इतकी मंडळी जमेल. तुम्हीच सांगा मी काय करु?"
"आजकालच्या पोरींना काही कामधंदे उरले नाहीत. बसतात युट्यूब  फेसबुक खेळत." केवल काका फुलराणीला रागात म्हणाले.
"काका मी आताच फेसबुकवर नाव शोधलं. ही मुलगी खरंच बोलतेय."
तोच 2 मुली तिथे येऊन धडकल्या. एकीच्या हातात माईक आणि एकीच्या हातात कॅमेरा. "नमस्कार मी वनश्री मोठे कॅमेरा मॅन बिनीसोबत माधव सोसायटी, कोथरूड इथून रिपोर्टींग करतेय."
"तर मि. सेक्रेटरी मी असं ऐकलं कि आपण एका शुल्लक कारणासाठी मि. आणि मिसेस नगरकरला सोसायटी सोडायची नोटीस दिली म्हणून."
"आधी तुम्ही सांगा तुम्हाला इथे कोणी बोलावलं."
"सर आपण लाईव्ह आहात टीव्ही 10 वर."
"बाबा नीट बोला. खरंच लाईव्ह आहात तुम्ही."त्यांचा मुलगा त्यांना सांगू लागला.
"नाही म्हणजे यांनी सोसायटीची परवानगी न घेता एका मानसिक रुग्णाला घरी ठेवलं आहे. 3 दिवस आधी ती बाई माझ्या मोतीच्या मागे धावली होती. तेव्हापासून जेवण सोडलं त्यानं."
"पण हा व्हेटर्नरी डॉक्टरचा रिपोर्ट तर म्हणतोय कि त्याचं पोट फुगलं आणि पोटात इन्फेकशन झालं आहे म्हणून त्याला जेवण नाही जात आहे." हातातला रिपोर्ट सगळ्यांना दाखवत फुलराणी म्हणाली.
"आणखी काही त्रास दिला का आराधनानं तुम्हाला कधी?"वनश्रीचा प्रश्न.
"नाही पण प्रिकौशन घ्यायला हवं ना. म्हणून आम्ही नगरकर कुटुंबाला नोटीस दिली."
"मग आता काय विचार आहे?"
"हे बघा सेक्रेटरी साहेब चूक झाली आमची. आम्ही खरंच तुम्हाला विचारून नंतरच आराधनाला घरी आणायला हवं होतं. पण इतकं घाईत ठरलं सगळं कि वेळच मिळाला नाही.
आम्ही पूर्ण काळजी घेतोय कोणाला काही त्रास होऊ नये याची. फक्त थोडं समजून घ्या प्लीज." अतुल म्हणाला. त्याला समजलं होतं कि सेक्रेटरीला विचारलं नाही म्हणून त्याचा अहम दुखावला गेला. म्हणून अतुलनं वाद न घालता समजूतदारपणा दाखवला.
"ठीक आहे अतुल. या सोसायटीचा सेक्रेटरी आहे मी. म्हणून सर्व शहानिशा करणं जबाबदारी आहे माझी. चला मग भेटू नंतर. मला एका मिटिंगला जायचं आहे."
फुलराणीनं वनश्रीला मिठी मारली, "थँक्यू डियर!''
"वेलकम !"
"द्वाड आहे माझी पोर." पूर्वा.
"म्हणून तर आवडली मला." राधा म्हणाली.
"प्रत्येक समस्येवर उपाय आहे हिच्याकडे. पण अमनचं काही खरं नाही."अतुल हसला.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 5

स्वीकार भाग 4 इथे वाचा

रवी अरुचं हे रूप पाहून भांबावला. त्यानं तिला थांबवायचा प्रयत्न केला, "आराधना शांत बस. घरी जायचं आहे. शांत हो."
"घर...." इतकंच बोलून ती खाली बसून जोर जोरात रडू लागली. तिचं कोणीतरी मेलं अशाप्रकारे आक्रोश करु लागली. रवीला काय करु समजत नव्हतं काय करावं? डॉक्टर लीलानं नर्सला एक इंजेकशन घेऊन यायला सांगितलं. 2 कंपाउंडरनं अरुला पकडलं आणि लीलानं तिला इंजेकशन दिलं. ती हळूहळू शांत झाली. कंपाउंडरनं तिला व्हीलचेयरवर बसवलं. एव्हाना राधा आणि पूर्वा आत आले.
"मी आताही सांगतेय अरुला हाताळणं कठीण आहे. पण तिच्या आईबाबांनी परवानगी दिली (राधानं अरुच्या आईबाबाला फोन करून अरुला घरी घेऊन जाण्याचा निर्णय सांगितला होता. त्यांचीही यायची इच्छा होती. पण अरुच्या बाबाची शुगर जास्त झाल्याने त्यांना काही दिवस तरी रेस्ट करायला सांगितलं होतं.) आणि डॉक्टर पूर्वा सोबत आहेत म्हणून मी तयार झाले. पण तरीही आमच्या पॉलिसीनुसार अरुला घरी नेल्यावर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही."
"तुम्ही त्याची अजिबात चिंता करु नका."
"पूर्वा चिंता वाटते कारण समाज मनोरुग्णांना accept करत नाही. अरु आणि या सर्व पेशंट माझ्या मुली आहेत. त्यांना कोणी हिणवलेलं पाहवणार नाही माझ्याकडून. इतकंच!"
"आम्ही लक्ष ठेऊ त्याबद्दल."रवीनं लीलाला आश्वासन दिलं.
"ते छान आहे. पण मला वाटतं रवीनं काही दिवस आराधनाच्या नजरेस न पडलेलं बरं. तिला त्रास होतो ते सर्व आठवून."
"तुम्ही जसं म्हणणार तसं."
"मी इतकंच म्हणतेय कि तिची मानसिक स्थिती थोडी दृढ होईपर्यंत तिला शॉक बसेल असं काहीच करू नका."
"ओके डॉक्टर."
"My best wishes are with you all."
डॉक्टर लीलाचं बोलणं लक्षात ठेऊन रवीनं त्याच्या पुण्यातच असलेल्या फ्लॅटवर राहायचं ठरवलं. हा फ्लॅट निधी आणि त्यानं लग्न केल्यावर विकत घेतला होता. निधीशी घटस्फोट घेतला तेव्हा रवीने फ्लॅटची अर्धी किंमत रोख तिला परत करून फ्लॅट स्वतःच्या नावाने करून घेतला. तो फ्लॅट तेव्हापासून बंदच पडलेला होता. तिथं एकांतात त्यानं त्याच्या भटकंतीवर लिहिलेलं पुस्तक परत लिहून प्रकाशनाला द्यायचं ठरवलं. आतापर्यंत एकटं राहून राहून त्याच्याजवळ भरपूर पैसे जमले होते. त्यात काही बिजनेस सुरु करून पुण्यातच राहायचं त्यानं ठरवलं.
.....................
अरुला घेऊन सर्व फ्लाईटनं पुण्याला, कोथरूड स्थित 'माधव' सोसायटीत असलेल्या राधाच्या (3BHK फ्लॅट) घरी आले. अरु औषधाच्या गुंगीत होती. राधानं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. "काकू थोडं कोमट पाणी घेऊन या."
"तुम्हीच घेऊन जा वा. मला भीती वाटते त्या पागल बाईची." वयाची पन्नाशी पार केलेल्या आणि राधाकडे मागील 2 वर्षापासून स्वयंपाकासोबतच इतर सगळी घरकामं करणाऱ्या उषा काकू म्हणाल्या.
"काकू पहिली गोष्ट अरुला पागल म्हणायचं नाही," रागाला आवरत राधा बोलली,"दुसरी ति तुम्हाला खाणार नाही. तेव्हा परत तिच्याबद्दल अपशब्द बोलायचं नाही."
"अहो पण बाजूच्या जांभळे मॅडम तर हेच म्हणत होत्या की तुम्ही एका पागल बाईला घरी घेऊन आल्या." ती भीत भीतच बोलली.
राधाला डॉक्टर लीलाचे शब्द आठवले. "तुम्ही फक्त इथल्या गोष्टी तिथं नका करु. सांगितलेलं काम करा." राधा तिच्यावर ओरडली. ती धावतच पाणी घेऊन आली. राधानं अरुचं स्पंजिंग केलं.
"चला जेवायला.उषा काकूंनी गरम गरम स्वयंपाक बनवला." अतुल (राधाचा नवरा) सर्वांना म्हणाला. डॉक्टर पूर्वा, फुलराणी, अतुल सर्व खालीच चटई टाकून जेवायला बसले. राधा अरुला घेऊन आली. एखाद्या निरागस लेकरासारखं तिनं गुपचूप वरण भात खाल्ला.
डॉक्टर पूर्वानं अरुसाठी एक छानसं वेळापत्रक बनवलं.
सकाळी 7 वाजता उठून कोमट पाणी पिऊन फ्रेश व्हायचं.
7:30 ला मॉर्निंग वॉकला जायचं.
8:00 ते 10:00 दरम्यान आंघोळ, नाश्ता, गप्पा.
10 ते 12 आवडतील ते कार्यक्रम टीव्ही वर पाहायचे किंवा काही गेम खेळायचं.
12 ते 1 लंच करायचा.
1 ते 3 झोप घ्यायची.
3 ते 4 चहा घ्यायचं, फ्रेश व्हायचं.
4 ते 6 आवडीचा छन्द जोपासावा, म्हणजे गाणं म्हणणं किंवा चित्र काढणं किंवा पेपर क्राफ्ट तयार करायचं.(जसं प्लेन, जहाज, पेपर बॅग, पेपर रॅबिट वगैरे बनवायचं )
6 ते 7 कॉऊंसिलिंग सेशन.
7 ते 8 तिला आवडेल ते करावं.
8 वाजता जेवण करून झोपणे.
"तु वेळापत्रक छान बनवलं. पण हे पाळल्या जाईल का?"
"ते तर अरुच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आणि पुर्ण वेळापत्रक जसच्या तसं पाळणं नाही झालं तरी काळजी नको करू. आपला हेतू तिच्या विस्कळीत आयुष्याला एक वळण देणं आहे. त्यासाठी अशा व्यवस्थित दिनचर्येची तिला सवय लावणं खूप आवश्यक आहे. बायपोलर आहे हे माहित असूनही खूप पेशंट छान कौटुंबिक आयुष्य जगतात ते अशा दिनचर्येनं आणि कुटुंबाच्या आधाराने."
"फुलराणी खरं बोलत होती तूझ्याबद्दल. आता मला खरंच खूप रिलॅक्स वाटतंय."
पूर्वाने बनवलेलं वेळापत्रक पाळतांना राधा, पूर्वा आणि फुलराणी तिघींची दमछाक होऊ लागली. त्यांची खरी परीक्षा आता सुरु झाली. कधी अरु सकाळी काही केल्या झोपेतून उठेचना तर कधी आंघोळ नाही करायची म्हणून जिद्द करे, कधी crafting चं सगळं सामान फेकून देई, कधी मॉर्निंग वॉकला गेलं कि कुत्र्यांच्या मागे धावत सुटे, कधी तिला जेवणच आवडेना, कधी कॉऊंसिलिंग सेशनमधेच ती झोपून जाइ, कधी सोसायटीतले आजूबाजूचे राधाला पकडून तिचं डोकं खात, सगळा सावळा गोंधळ सुरु होता.
राधाला, अरुला घरी नेऊन 10 च दिवस झाले होते. सोसायटी प्रेसिडेंट मि. प्रथम तिला आणि अतुलला भेटायला आले. 11 वाजले होते. अरु फुलराणीसोबत टीव्ही पाहत होती. पूर्वा पुण्याच्या एका मेंटल हेल्थ ऑर्गनाइझेशनला भेट द्यायला गेली होती. अतुल ऑफिसला गेलेला. राधाने दार उघडलं.
"नमस्कार!"
"नमस्कार, आज सकाळी सकाळी."
"11 वाजलेत राधाजी."
"अरे हो. या बसा आत मि पाणी आणते."
"असू देत. मि फक्त हे द्यायला आलो होतो आपल्याला."
"काय आहे?"
"सोसायटीच्या लोकांनी कम्प्लेंट केली आहे तुमची. तुम्ही एका वेड्या बाईला घरी आणलं आहे म्हणे."
"पण तिचा कोणालाच काही त्रास नाही."
"हो पण त्यांचं म्हणणं आहे कि मुलांवर विपरीत परिणाम होईल आणि ती मॉर्निंग वॉकला जातांना मिसेस नायकच्या मोतीच्या(डॉगीच्या) मागे  धावली म्हने. तेव्हापासून तो काहीच खात नाहीये."
"तेव्हा तिला दुसरीकडे शिफ्ट करा नाहीतर तुम्ही ही सोसायटी सोडा. ते तर म्हणत होते 3 दिवसांचाच वेळ द्या. पण मि समजू शकतो तुमची व्यथा म्हणून 7 दिवसांचा वेळ देतोय. जातो आता."

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

Sunday 17 May 2020

स्वीकार भाग 4

स्वीकार भाग 3 इथे वाचा

स्वीकार भाग 5 वाचण्यासाठी इथे क्लीक करा

हाय मी फुलरानी, मला रवि सोबत बोलायचे आहे.''

''मीच बोलतोय,'' कोण आहे ही या विचारात,''काय काम काढलेत आपण ? हे बघा मला क्रेडिट कार्ड ही नको किंवा लग्नासाठी मुलगीही नको आहे. मी एकटाच इनफ़ आहे माझ्यासाठी."

''अरे नाही मी कोणी सेल्स गर्ल नाही. मला सहज तुला भेटायचे आहे.''

''कशाला ?'' आवाज़ावरून वय लहान वाटते. राधाने तर कोणाला माझ्या मागे लावले नाही ना. अश्या विचारात असतांनाच फूलरानीने त्याची तंद्री भंग केली. ''तुमची मुलाखत घ्यायची आहे. सतत भटकंती करनारयांवर डॉक्यूमेंट्री बनवतेय. त्या डॉक्यूमेंट्री साठी.''

"साॅरी माझ्याजवळ वेळ नाही." असं म्हणून रविने काॅल कट केला. फुलराणीने एका हॅकर मित्राकडून रवीचे फेसबुक हॅक करून मोबाईल नंबर मिळवला होता. फुलराणीला केवळ रविचं लोकेशन ट्रॅक करायचं होतं. जे झालं. सुदैवाने रवि लेह लदाख मधे म्हणजे भारतातच होता. ज्यामुळे फुलराणीला त्याला भेटनं कठिण गेलं नाही. रवि तिथं मागील दोन महिन्यांपासून टॅक्सी ड्रायव्हर आणि गाइड म्हणुन काम करत होता. उन्हाळा असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती.
फुलराणी सरळ त्याच्या रूमवर जाऊन धडकली.

"आराधनाला ठीक करण्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे." फुलराणीने त्याला रोकठोक सांगुन दिले.

"कोण आराधना? मला नाही आठवत!", सिगरेट ओढत तो म्हणाला, "प्लिज मला एकटे राहू दे आणि माझ्या बहीणीला सांग माझा पिच्छा पुरवू नको."

"हे बघा मला लग्न या विषयावर पुस्तक लिहायचे आहे म्हणून अमनसोबत लग्न करायचं आहे म्हणून लवकरात लवकर आराधनाला बरं करायचं आहे. कारण तुझ्या बहीणीचा जिव आराधनात अटकला आहे आणि आई म्हणते की ति बरी होण्याची तुच एक आशा आहे." रविच्या रूम समोर पालकंड मारून बसत,"तु जोपर्यंत सोबत चालणार नाही, मि इथून हलणार नाही."
"जसं तुला हवं तसं कर." म्हणत त्यानं रूमचं दार लावलं. परत एक सिगरेट जाळली आणि तोंडात धरून विचार करु लागला,
ही 16-17 वर्षाची इवलीशी दिसणारी पोर कशाला त्याच्या मागे लागली आणि त्याचा आराधनाला ठीक करण्याशी काय संबंध? नक्की राधाच्या डोक्यात काय शिजतंय? आणि आराधना ती तर त्याचं डोकं खान्याशिवाय इतर काहीच करत नव्हती. आराधनाचा विचार करतांना ते किशोर वयातले दिवस आठवून तो स्वतःशीच हसला. लगेच सिरीयसही झाला, "असं काय झालं होतं तिच्या सोबत कि तिला पार वेड लागलं? एकदा बोलायचं तर होतं माझ्याशी. ज्या कोणावर प्रेम करत होती त्याला कान धरून तिच्यासमोर उभं केलं असतं.(अरु बद्दल अफवा उडली होती कि तिला आवडणारा मुलगा मिळाला नाही म्हणून ति पागल झाली.) पण तिनं तर मला काही सांगण्याच्या लायकीचंही समजलं नाही. समजणार तरी कशाला? होतं काय माझ्याजवळ? ती कुठे आणि मी कुठे? ती सुखवस्तू घरातली, शाळा कॉलेज टॉपर मुलगी अन मी साधारण घरातला, नोकरी करत कसातरी बी टेक डिग्री पूर्ण केलेला. मेळच नव्हता आमचा म्हणून तर आराधना आवडत असूनही तिलाच काय पण स्वतःच्या बहिणीलाही कधीच कळू नाही दिल्या माझ्या भावना."

रात्र झाली तेव्हा रवीला फुलराणीची आठवण आली. त्यानं दार उघडून बघितलं. फुलराणी सगळं शरीर एकवटून तिथंच मोबाईलमधे डोकं खुपसून बसलेली आहे हे पाहून रविला एकदा राधाला भेटन्यातच भलाई वाटली.

"उद्या जाउ पुण्याला." फुलराणीला आत घेऊन रविने तिला सांगितलं.

''नागपुर ....''

''का ?''

''कारण आराधना नागपुरला असायलम मधे आहे.''

''ओके !''

पहाटेच फ्लाइटने दोघेही आधी दिल्लीला गेले मग दिल्लीवरून नागपुरला रवाना झाले. राधा आणि डॉ पूर्वा आधीच नागपुरला हजर होत्या. असायलमच्या डॉक्टर सोबत बोलुन आराधनाला घरी घेऊन जायची तयारी सुरू होती.

''राधा मला का ओढ़तेय या सर्वात ? मी खुश आहे.''

''खरंच ! मला तर नुकतेच कळले कि निधी ही तुझी पहिली निवड नव्हती. तुझी पहिली निवड आराधना होती."
"......." रवीला शॉक बसला, "असलं काहीच नव्हतं. निधीनं मला त्रास व्हावा म्हणून हे खोटं सांगितलं तुला."
"पण मी तर म्हटलंच नाही कि हे निधीनं सांगितलं म्हणून, " थोडा विचार करून राधाने डॉक्टर पूर्वाच्या निष्कर्षाबद्दल सांगितलं.
"खरंच नसेल अरुबाबत काही तूझ्या मनात तर नसू दे पण तिच्या भल्यासाठी राहा काही दिवस आमच्यासोबत.''

''तू आणि अरू ... नाटक नाही करत आहेस ना ? आधी जशी ती गणित न समजल्याचा आव आणून एकच गणित माझ्या कडून १० वेळा करवून घ्यायची.''

''नाही रे ...आता तुला कसे सांगू ?''

''काहीच नाही,'' फुलरानीकड़े पाहून,''आणि परत हे असे खुळ माझ्याकड़े पाठवु नको.''

रवि तिथुन जाणार तोच एक नर्स आणि आया अरुला बाहेर घेऊन आल्या. त्याने नखशिकांत तिला न्याहळले. माझी पार रया गेलेली पाहून त्याचा चेहरा गरगर उतरला. अवखळ, उनाड, सदानकदा मस्ती मुड असलेली सोडष वर्षीय त्याच्या आठवणींच्या कप्प्यातली ती आणि वर्तमानातली डिप्रेशन मोड मधे गेलेली ती!

"अरुला पाहून तुला वाटतं का की आम्ही नाटक करतोय म्हणून?" राधाने रविला विचारलं. तो गप्प होता."हे बघ फक्त थोडीच मदत कर. मी जास्त दिवस नाही घेणार तुझे. पण अरू बरी झाली तर तुलाही काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळेल."

"आणि नाटक करतांना मी तिच्या प्रेमात अडकलो तर?  आता परत नाही सांभाळू शकेल मी स्वतःला." तो स्वतःशीच पुट्पुटला.
................
नर्स अरुला घेऊन गाडीच्या दाराजवळ गेली. पण अरु तिथंच थबकली. आत बसत नव्हती. राधा तिचा हात हातात घेऊन म्हणाली, "अरु बस गाडीत. आपल्याला घरी जायचं आहे.''
"घरी? कोणाच्या घरी?  माझं कोणतंच, कुठेच घर नाही." इतकं बोलून अरुने राधाला जोरात धक्का दिला आणि ती धावतच असायलमच्या आत गेली. खाली पडलेल्या राधाला पूर्वा आणि रवीनं उभं केलं.
"तु ठीक आहेस ना?"
"हो मी ठीक आहे. पण तु बघितलं ना कसं ढकललं तिनं मला. असं कसं होईल आपलं प्लान सक्सेस?"
"तिला थोडा वेळ द्या. 21 वर्षांपासून ती इथं आहे." असायलमच्या साठी पार वय असलेल्या सायकिऍट्रिस्ट लीला म्हणाल्या," त्यात मी आधीच सांगितलं होतं, तिची बरी व्हायची अजिबात इच्छा नाही."
"मी प्रयत्न करतो." रवी बोलला. राधाने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं तरी डॉक्टर पूर्वा गालातल्या गालात गोड हसली. फुलराणी सगळं नोट करण्यात बीजी होती.
रवी सायकियाट्रिस्ट लीला सोबत असायलमच्या आत गेला. अरु तिच्या रूममधे बेडखाली लपून बसली होती. रूमच्या आत जाताच रवीची नजर भिंतीवर वेगवेगळ्या डिजाईनमधे काढलेल्या R वर पडली.
"हे आर माझ्यासाठी आहेत का?" नकळत त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला.
"अरु बेडखालून बाहेर ये बघू. तुला चॉकलेट मिळतील." लीला जेव्हापन अरुला तपासायला येई. ती अशीच बेडखाली लपत असे. त्यांना तिची सवय पाठांतर झाली होती. मग त्या तिला चॉकलेटचे आमिष दाखवायच्या आणि अरु बाहेर येई. म्हटल्याप्रमाणे त्या तिला एक डेरीमिल्क चॉकलेट देत. पण आज अरु चॉकलेटचे आमिष देऊनही बाहेर आली नाही.

"अरु बाहेर ये.'' रवी बेडजवळ जाऊन वाकून तिला म्हणाला, "तो गणिताचा एक फॉर्म्युला शिकायचा राहिला आपला. आठवतं...? "
गणित फॉर्म्युला.. कोण असेल हा. रवीचा आवाज तिला ओळखीचा वाटला. पण कोणाचा आवाज ते आठवेना. पूर्व  आयुष्यातल्या जवळ जवळ सर्वच माणसांचा विसर पडला होता तिला. रवीला पाहण्यासाठी ती बाहेर आली. रवी अजूनही जसाच्या तसाच दिसत होता. फक्त कानावरचे केस पिकायला सुरवात झाली होती.
"रवी..." अरुनं एक नजर भिंतीवरच्या R वर टाकली. मग परत त्याला पाहिलं आणि ती नाचत, उड्या मारत,  जोर जोरात ओरडू लागली,  "रवी रवी... रवी आला... माझा मित्र आला... रवी."
एकदम 21 वर्षांनी रवीला पाहून अरुला मॅनियाचा अटॅक आला होता.

क्रमश:

फोटो साभार गौरी वानखेडे (actress & model)

@अर्चना सोनाग्रे वसतकार
धन्यवाद !

स्वीकार भाग 3

स्वीकार भाग 2 इथे वाचा
स्वीकार भाग 4 वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रविला अरूबद्दल काय वाटायचे.'' डॉ पूर्वाने राधाला विचारले.

''एका मित्राला आपल्या मैत्रीनीबद्दल जे वाटते तेच दादाला अरूबद्दल वाटायचे. अरूला तिच्या लग्नात स्वलिखित गणिताच्या पुस्तकाची पहिली प्रत देईल म्हणे. नाहीतर लग्न झाल्यावर मुलांना घेऊन यायची माझ्याकडे. पण ते झालेच नाही. अमृताला असायलममधे दाखल केल्याचे ऐकुन हळहळला होता तो.'' शून्यात कुठेतरी तिची नजर हरवली होती. कदाचित भूतकाळात जाऊन तेव्हाचे रवीचे हावभाव आठवत होती ती.

''आता काय चाललेय त्याचे?''

''आता काय चाललेय त्याचे ????'' डॉ पूर्वाचा प्रश्न रिपिट करत खिड़कीजवळ उभी राहून तोंडावर हात ठेउन, ओठ दाबत उत्तरली,''मला नाही माहीत, आता त्याचे काय चालु आहे ते.''

''आणखी एक मिस्ट्री ??'' डॉ. पूर्वा स्वताशीच बड़बडली.

''आयुष्यात इतके असाहाय्य कधीच वाटले नाही बघा. जीवलग मैत्रीनीचे मन समजले नाही आणि सख्खा भाऊ मागिल ७-८ वर्षा पासून कुठे, कसा आहे काहीच माहीत नाही. '' गालावरुन ओघळनारे अश्रु पुसत,''पण तो जीवंत असण्याच्या खाना खुना मीळत राहतात फेसबूक, इंस्तावर. तेवढ्यानेच तो जिथे आहे तिथे सुखरूप आहे असे मानुन समाधानी होते."

''बायको आणि मुलं?''

"मुलं झाली नाहीत, वाद वाढतच गेले, शेवटी ८ वर्षांआधी त्यांनी विचार विनिमय करून घटस्फोट घेतला. तेव्हापासून एका जिप्सीचे जिवन जगतोय तो. आम्ही प्रयत्न केला त्याच्याशी बोलण्याचा. पण तो कशालाच प्रतिसाद देत नाही. त्याला वाटतं आम्ही सहनाभूति दाखवतोय. म्हणून टाळतो आम्हाला. सतत धावत असतो. इथुन तिथे, तिथुन परत कुठेतरी. ८ वर्ष झाली स्थैर्य नाही त्याला.''

''म्हणजे होप आहे राधा.''डॉ पूर्वाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

''कशाची ?''

''आराधना आणि रविच्या विस्कटलेल्या आयुष्याला स्थैर्य लाभायची !''

''ते कसे ?''

''आधी आपण आराधनाला घरी घेऊन येउ. ती घरच्या वातावरनात आपल्यासोबत राहील, २४ तास मी तिला ऑब्जर्व करेल. होउ शकते की प्रेम, आपलेपना, योग्य आहार विहार आणि औषधिच्या मदतीने तिचे मानसिक संतुलन लवकरच जागेवर येईल.''

''तिला हॅंडल करणे सोपे नाही.''

''I know that. पण रवि सोबत असला तर सर्वच सोपे होईल.''

''तो भेटेल तेव्हा ना ....''

''त्याची काळजी तु करू नकोस. फुलरानी बोलेल त्याच्याशी. लोकांना पटवण्याच्या कलेत माहिर आहे ती.''

''हो ह्या बाबतीत मला अजिबात शंका नाही.'' अमन सोबत लग्न करण्यासाठी फुलरानीने तिला कसे पटवले ते आठवून,''अनुभव आहे मला.'' दोघी एकमेकींकड़े पाहून मिश्किलपने हसल्या.
"रवीआधी त्याची बायको निधी सोबतही बोलावं लागेल आपल्याला."
"कशाला?"
"आराधनाला पटवून द्यायला कि रवी खरंच एकटा आहे."
"बरोबर. कारण त्याचा संसार विस्कटू नये म्हणून हिने सगळं मनातच दडवून ठेवलं. तेव्हा निधीला भेटू आपण आणि सांगू सगळं."
"ती समजून घेईल?"
"नक्कीच, रवीपेक्षा जास्त समजूतदार आहे ती. घटस्फोट झाल्यावर अरेंज मॅरीएज केलं आणि एका 8 वर्षाच्या मुलाला दत्तक घेऊन इथे पुण्यालाच आनंदात संसार करतेय ती."
"छान !"

एक एक कप कॉफी घेऊन त्या दोघी रिलॅक्स झाल्या.

''खूप हलक वाटतेय आज.'' पूर्वाचा हात हातात घेऊन,''आमच्यासाठी तुझी सगळी कामं सोडून दिल्ली वरून इथे आल्याबद्दल धन्यवाद पूर्वा !''

''अरे इट्स ओके डियर ! मी तर माझ्या पागल पोरीसाठी इथे आली. म्हटलं ह्या केसच्या निमित्ताने का होइना तिच्या होणारया सासुची भेट होईल आणि कधीही न पहिलेला आपल्याच देशाचा भाग पन पाहिल्या जाईल.''

''ओहो रियली,'' पूर्वाने होकारार्थी मान हलवली म्हणून राधाने विचारले ,''मग कशी वाटली सासु ?''

''उम्म ....... '' इकडे तिकडे पाहत पूर्वा,''छान वाटली ग आणि सासु पेक्षा मैत्रीणच जास्त वाटली.'' घड्याळाकड़े पाहून,''सहा वाजत आहेत. मी निघते आता. बघते जरा तुमचे पुणे कसे आहे ते? आणि माझ्या पोरीला पण कामाला लावते रवीचा शोध घ्यायला."

....................
राधा आणि डॉक्टर पूर्वा निधीला भेटायला तिच्या घरी गेल्या. तिनं त्यांचं स्वागत केलं. जास्त आढेवेढे न घेता राधाने विषयालाच हात घातला.
"माझ्या बोलण्याने रवीचं भलं होईल तर मी नक्कीच भेटेल आराधनाला आणि तुम्ही म्हटलं तसंच सांगेल तिला. मला वाटलं होतं आमचा घटस्फोट झाल्यावर तो स्थिरावेल. पण तो अजूनच विस्कटला. खरं सांगू का त्याला मी प्रपोज केलं होतं लग्नासाठी. तेव्हा तो मला म्हणाला होता कि, 'तु माझी पहिली निवड नाहीस. पण ती माझ्या अवाक्याबाहेर आहे.' म्हणजे मी भेटायच्या आधी त्याला नक्कीच कोणीतरी आवडत होतं."
"काय?" राधाला शॉक बसला.
"म्हणजे रवीलाही आराधना आवडायची कि काय?"डॉक्टर पूर्वाने तिची शंका बोलून दाखवली.
"माहित नाही पण आमच्यासोबत कॉलेजमधे ती मुलगी नव्हती हे नक्की."
"देव आपली ही काय परीक्षा पाहतोय."
"लवकरात लवकर रवी भेटो. तोच हे गूढ उलगडणार आता."

क्रमश:

फोटो साभार गौरी वानखडे (actress & model)

अशाच छान कथा, लेख वाचण्यासाठी माझा ब्लॉग फॉलो करा.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.


LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...