Friday 9 August 2019

ते मुल आहे माझे

शारदाचा आई होण्याचा प्रवास खूपच आनंददायी होता. पंचविशी पार झाल्यामुळे ती म्हणतच होती की लग्न झाल्या बरोबर बाळ होउ देईल. तिच्या मना सारखं झालं सर्व. पण ह्या पुढ़चा प्रवास फार कठीण आहे हयाची तिला अजिबात कल्पना नव्हती.
पहिली लढाई तर आई सोबतच झाली. मे महिण्याची गरमी आणि आईचा बाळ आणि बाळंतनिला एसी किंवा कूलर मधे न ठेवण्याचा तगदा, म्हणे बाळाच्या कानात हवा शिरते. फक्त वरण, तूप आणि पोळीच खायला देने. इतर काही खाल्ले तर बाळाचे पोट फुगेल. आईवर झालेल्या संस्कारांमुळे आणि अनुभवाने त्यांना ते योग्य वाटत होते. डाॅक्टरांचा कशालाच नकार नाही. शारदालाही आईचं पटले नाही. काही पथ्य ठिक आहे पण इतक्या गर्मित बाळाला लु लागेल म्हणून ती त्यांचे काही ऐकायलाच तयार नव्हती. कदाचित बाळंतपणा नंतर होणारया हार्मोनल चेंजेसचा हा परिणाम असावा. म्हणून मग ११ दिवस झाल्यावर तिचा नवरा सागर तिला घरी घेऊन गेला. तर एक नविन नाटक सुरू झाले.
बाळ एकीकडे मान टाकून एकाच दिशेला पाहत राहायचं म्हणून सासुबाईंची आपली शंका,"एकीकडेच मान टाकतो. मानेत काही प्राॅब्लेम तर नाही ना?" मग काय मानेला लावायच्या उशा आणल्या. पण उशा लावल्या की बाळ रडायचं. शेवटी डाॅक्टरांनी सांगितलं की काही नवजात मुलं टाकतात अशी मान तिच्यात जिव येईपर्यत, तेव्हा सासुबाई शांत झाल्या.
बाळ सहा महिन्याचं होताच शारदाने डाॅक्टरच्या सल्ल्याने बाळाला फळांची चव द्यायला सुरू केलं आणि सातुची खिर चालू केली. कारण तिला दुध फार कमी येत होतं. बाळाला दात येउ लागले आणि तो वेळी अवेळी शी करू लागला. खापर हिच्या फळांच्या चविवर फोडल्या गेलं.
पुढे बाळ तिन - चार वर्षाचं होतेय तरीही स्पष्ट बोलत नाही म्हणून आजुबाजुचे त्यांचे मुलं कधी, कसे व किती लवकर बोलायला शिकले ते सांगायचे सोबत सल्लेही द्यायचे,"सहद चाटव, गळा साफ करून घ्या, कसलीशी वटी खाउ घाला, स्पिच थेरपी सुरू करा ...." तिने सर्व सल्ले ऐकले आणि केले मनाचे. तिला कळत होतं की सर्वच मुलांची डेव्हलपमेंट सारखी होत नाही. तेव्हा बाळाला आपण आणखी थोडा वेळ द्यायला हवा. कारण बाळ काही अगदी मुके नव्हते. ते बोलायचे. अगदी गळा फाडून ओरडायचे. फक्त नक्की काय बोलतो ते समजत नव्हते. हळूहळू ही गोष्टही साॅल्व झाली. बाळ बोलु लागलं तेही काही थेरपी वगैरे न घेता.

आता सहा वर्षाच्या बाळाला शाळेत टाकायची वेळ झाली. परत सल्ले मिळू लागले, अनुभवाचे गोडवे ऐकवू लागले. ही शाळा चांगली इथेच टाक, तिथे नको, तिथं का टाकलं? तिथलं शिक्षण स्लो आहे, तिथलं फास्ट आहे. पण तिला कळत होतं की तिच्या बाळाला कशी शाळा हवी आहे ते. त्यात असेच आपण सर्वांचं ऐकत बसलो तर पुढे परिस्थिती आणखी कठीण होईल म्हणून यावेळी तिने सर्वांना बोलून दाखवलं,
"ते मुल आहे माझं. मि जे ही करेल, करतेय ते भल्यासाठीच करते त्याच्या आणि जे गरजेचे आहे तेच करते. माझ्या शरीराबाहेर वाढनारं माझंच एक अंग आहे, ते मुल आहे माझं. मलाच माहिती असेल ना की त्याला नक्की काय हवं आहे? उगिच नसते सल्ले देउन माझा गोंधळ वाढवू नका. कारण ते मुल आहे माझं !"
ह्या तर अगदीच थोड्या समस्या मि इथे मांडल्या आहेत. एका आईला तर पावलोपावली समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात नाव ठेवणार्यांची आणि सल्ले देणार्यांची गर्दी ! म्हणून वेळीच आईनेही स्ट्राॅंगली अशांना सांगायला हवं की,"ते मुल आहे माझं आणि मला माहीतेय त्याला कसं मोठं करावं !"

धन्यवाद !

published on momspresso.com


@अर्चना सोनाग्रे वसतकार

गर्भनिरोधक

काव्या खुप चिंतातुर होती. तशी I pill घेतली होती तिनं सकाळी उठताच. पण पाळीची तारीख जाउन आठ दिवस झाले तरीही अजुन पाळी आली नव्हती. त्यात सारखं मळमळ, डोकं दुःखी आणि चक्कर येणे सुरूच होतं. सगळी लक्षणं दिवस राहिल्याची दिसत होती. I pill घ्यायची तिची पहीलिच वेळ होती त्यामुळे तिला हे कळलंच नाही की वरची सर्व लक्षनं प्रेग्नेंसीची नसून त्या आय पिलचे ते साइड ईफेक्ट आहेत. मोहीत घरी येताच काव्याने तिची चिंता त्याला बोलून दाखवली. तेव्हा तो एकदम लाइटली म्हणाला,"अग हे साइड ईफेक्ट आहेत आय पिलचे. येइल पाळी २-३ दिवसांत."
"थोडीशी डोकं दुखिही सहन नाही होत या बाईला.", तो बाथरूम मधे जात बडबडला. काव्याला खुप वाईट वाटलं पण ती काहीच बोलली नाही. कंटाळली होती. त्यांच्यासोबत वाद घालन्यात तिला काही अर्थच वाटत नव्हता. एक वर्षाची मणी बेडवर शांत झोपुन होती. मोहीतला न सांगताच काव्या पर्स घेउन बाहेर गेली. तिच्या मनात संतापाचं वादळ आलं होतं. पण भांडणानं ते शांत होणारं नव्हतं.
लग्न झाल्यावर दुसर्याच महीन्यात गुड न्युज (इतरांसाठी, तिला इतक्यात बाळ नको होते.) मिळाली. मणी एक वर्षाची होत नाही तो परत काव्याला दिवस गेले. डाॅक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घेउन गर्भ पाडला आणि काव्याने महिन्याच्या गर्भनिरोधक गोळ्या घेणं सुरू केलं. पण तिची तब्येत सारखी खराब राहू लागली म्हणून मग गोळ्या बंद केल्या आणि काॅपर टी बसवली. पण पहिल्याच महीन्यात पाळीला अति रक्तस्राव झाला आणि तिला रक्त द्यावं लागलं. म्हणून काॅपर टी काढून टाकली. म्हणून मग आय पिल हा नविन उपाय मोहीतने शोधून काढला. पण काव्याला ह्या पिलमुळेही त्रास होतोय हे ऐकुन त्याला तिचाच राग आला.
"मला न सांगता, मणीला एकटं सोडुन कुठं गेली होती ?" काव्याने घरात पाय टाकताच मोहीत तिला विचारू लागला. तिनं काहीच न बोलतां वर्तमानपत्राच्या छोट्या लिफाफ्यात असलेलं एक पाकीट त्याच्या हातात दिलं.
"हे काय ?"
"उघडून बघा."
"क.....क.....काॅ..." पाकीटातली वस्तु पाहून तो अवाक झाला."तु आणलंस ?"
"हो, मीच आणलं !" मणीला पदराआड घेउन दूध पाजत ति,"आतापर्यंत खुप सहन केलं मि. आता करणार नाही. आजपासून माझ्या जवळ यायचे असेल तर याच्यासहच."
काव्या आज मोहीतला खुप वेगळी आणि नविन वाटली. नक्की काय बोलावं त्याला कळत नव्हतं. कारण आजपर्यंत ती कधीच त्याच्या शब्दाबाहेर गेली नव्हती. मग आज.....

"माझं खुप डोकं दुखतंय म्हणुन मि डिनर बनवला नाही. तेव्हा बाहेर घेउन चला नाहीतर मॅगी बनवून द्या." हे ऐकुन तर मोहीत अवाक झाला. त्याला नव्हतं माहीत आज दुर्गा देवी साक्षात त्याच्यासमोर अवतरली आहे.
"काय ठरवलं साहेब ?" मोहीतच्या गळ्यात हात टाकत काव्याने त्याला लाडात विचारले. कारण तो ती एक गोष्ट सोडली तर कुठेच कमी पडत नव्हता. तिला भांडण वगैरे नको होतं. फक्त तिला होणारया त्रासावर उपाय हवा होता. म्हणून तिनंही स्वताला शांत केलं होतं.
"बाहेरच जाउ. मि गाडी काढतो तु ये मणीला घेउन." हातातलं पाकीट खिशात ठेऊन तो हसतच बाहेर गेला. त्यालाही तो कुठेतरी चुकला हे समजलं होतं. जेव्हा तिनं नमतं घेतलं त्यालाही शांत राहण योग्य वाटलं.
मैत्रीणिंनो बोलत्या व्हा. सहनशीलतेच्या नावावर थोपवल्या जाणार्या गोष्टींना नकार द्या. स्वःताचे आरोग्य जपा. तेव्हाच परिवाराचे आरोग्य जपु शकाल.

धन्यवाद!

@अर्चना सोनाग्रे वसतकार


माझे लेख माझ्या नावासोबत प्रकाशीत करायला माझी काहीच हरकत नाही. धन्यवाद !

कसरत ... सोण्याचा पिंजरा तोडन्यासाठी

"मला नोकरी करायची आहे." राणी.
"परत तेच आणि आता तर पिलु पण आहे." पायात साॅक्स चढवत राजा,"तुला काही कमी पडू देतो का मी. बायका तरसतात या आरामासाठी आणि तु....."
राजा टिफीन बॅग घेउन निघून गेला. राणीने पटपट आवरलं. सासुबाई सकाळचा फेरफटका मारून आल्या. त्यांना चहा नाश्ता देउन त्या काही विचारायच्या आत तीच बोलली,"मी जरा बाहेर जातेय. पिलुला भरवलंय. येते एकदीड तासात." चटकन बाहेर पडली. सासुबाई अवाक होउन पाहत राहल्या. आज पहिल्यांदा राणी त्यांना कुठं, कशाला जातेय न सांगतां घराबाहेर पडली. दिड दोन तासात परतली.
"काय गं कुठं आणि कशाला गेली होतीस? सांगीतलं नाही तु?" राणी घरात पाय ठेवत नाही तो सासुनं विचारलं.
"इंटरव्यू द्यायला गेली होती. उद्या पासून जाॅइन होतेय. सकाळी १० ते ५ पर्यंत. जवळंच शाळेत ॲडमिन म्हणून. ६००० पगार आहे." राणीने एका दमात सगळं सांगून दिलं.
सासू तिला काहीच बोलली नाही. पण राजाला फोन करून बातमी पोचती केली आणि म्हणाली आता या वयात मी काय काय करणार? १ वर्षाच्या पिलुला पाहणार की घरकाम करणार? तो घरी येताच धुसफुस करू लागला. त्यावरून राणीला कळलं की बातमी पोचती झाली. पण ती काहीच बोलली नाही. राजाला चहापाणी देउन स्वयंपाकाला लागली. जेवनं आटोपली. सासू आपली कान देऊन भांडनाच्या आवाजाची वाट पाहत होती. पिलूला पाळण्यात टाकून राणी राजाजवळ बसली. सासूला सांगीतलेली नोकरीबद्दलची माहिती तिने राजाला सांगितली.
"म्हणजे तु नोकरी करणारंच!"
"हो."
"अग हो म्हणतांना काही वाटतं का तुला? आई काय काय करेल? पिलू कसं राहील? विचार कर डोकं जाग्यावर ठेउन."
"सर्व विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. शाळा जवळच आहे. लंचटाईमला घरी येउन पिलूला भेटत जाईल."
"कर तुला काय करायचं ते, पण आमची रूटीन लाइफ डिस्टर्ब व्हायला नको. हे लक्षात ठेव!" एवढं बोलून तो त्याच्या मोबाईलमधे हरवला.

राणी मनोमन समाधानी झाली कि जास्त तनतन न होता राजा हो म्हणाला. किचनमधे गेली. सकाळी भाजी काय करायची? नाश्ता काय करायचा? सर्व ठरवून. होइल तेवढी पुर्वतयारी करून राणीही झोपली.
सकाळी पाचलाच उठली. आंघोळ करून स्वयंपाक, नाश्ता, दोघांचे डबे भरून रडून मागे लागलेल्या पिलुला कसंतरी खेळन्यांमधे रमवुन आॅफिसला निघाली. पावलं जड झाली. पण मनगटावरचं घड्याळ म्हणालं निघ आता. निर्णय घेतलाच आहे तर आता माघार नको. ति गेल्यावर सासूने राजाला फोन करून विचारलं की त्याने राणीच्या नोकरीला नकार का नाही दिला.
त्याचे उत्तर,"अग ती त्या महीला मंडळात जाते ना तिथं कान भरले तिचे कोणीतरी. नाहीतर एखादीचं पाहून हिला पण आली असेल गुर्मी MBA असल्याची. तु कोणत्याच कामाला हात लावू नको. फक्त आधीसारखी पिलुची काळजी घे. बघ आई गेल्या २-३ वर्षांपासून घरीच आहे ती. आरामाची सवय झाली आहे तिच्या शरीराला. आणि मनाचं पक्केपन म्हणशील तर हे बाॅस लोक आणि सिनीयर टुचकन्या मारून तोडतात माणसाला. इतकं सोपं नसतं कोणाच्या हाताखाली काम करणं. लवकरच समजेल तिला. घरचं बाहेरचं करून दमेल अन् बसेल घरी ती बघ! म्हणून म्हटलं काय वाद घालायचा. होउ दे थंडी!"
तसं पाहता राजाचं म्हणनं काही खोटं नव्हतं. लग्न होउन तीन वर्ष होत आलेली. साडेसहा सात वाजल्याशिवाय राणी कधी उठली नाही. आजही पाचला काहीशा कंटाळ्यानेच उठली ती! इतकी वर्ष राणी साधी शाॅपिंगला सुद्धा एकटी कुठे गेली नव्हती. आतातर ती पुर्ण दिवस बाहेरील जगाला एकट्याने तोंड देणार होती. आणि ते सोपं नक्कीच नाही. त्यात ॲडमिनचा जाॅब म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. आणि तेही एका नर्सरी ते बारावी वर्ग असलेल्या CBSC शाळेत. जिथे ३०-४० शिक्षक आणि १०-१५ इतर एम्पलाॅइ. इतक्यांच्या सुट्ट्या, पगार, शाळेचे इतर ॲडमीनिस्ट्रेशन रिलेटेड काम, हळूहळू सगळंच राणीच्या पारड्यात पडनार होतं.

शाळेतिल जुन्या आणि वयस्कर टीचर लोकांना मॅनेजमेंटचे असे कोणातरी नवीन मुलीला ऍडमीन बनवने अजिबात रुचले नाही. आधीच पंचिंग मशीन बसवून त्यांच्या शाळेत येण्याजाण्याच्या वेळेवर अंकुश बसवण्यात आला होता. त्यात (त्यांच्या कामात ढवळाढवळ करायला) ॲडमीन म्हणजे डोक्याला ताप! त्यांच्या मते आतापर्यंत त्यांना जसे मर्जीचे वातावरण होते तसेच पुढेही राहावे. त्यांनी येणार्या ॲडमिनला कसल्याच प्रकारचे सहकार्य न करायचे ठरवले.
राणीला प्रिंसीपलने शाळेत आतापर्यंत चालत आलेल्या मनमर्जी कारभाराची माहिती तिला इंटरव्यूच्या वेळेस दिली होती. "जाॅब टफ आहे पण तुही जिद्दी दिसतेस. म्हणून तुला संधी देतेय. तु तिचं सोनं कर!" राणीनेही ते केलं. ती सर्व टीचींग आणि नाॅन टीचींग स्टाफ सोबत नम्रतेने वागत होती. काहीही करायच्या आधी सिनीयर टिचर्सचे मत घेत होती. पण तरीही त्यांच्या चेहर्यावर नाखुशीच दिसत होती. शाळेतलं संपत नाही तो घरी आल्यावर पिलु संतापलेलं असायचं. दिवसभर दिसली नाही म्हणून राणीला चटचट चापटा मारायचं. त्याचं होत नाही तो सासूबाई,"दिवसभर खूप त्रास दिला ग पोरानी. डोकं भनभन करतेय. चहा दे चांगला करून कडक. मी पडते तोवर. आणि मग राणीची कसरत सुरू व्हायची. एकीकडे पिलू हे उचलणार, ते फेकनार... त्याला सांभाळत हिचं चहा आणि स्वयंपाक हे सगळं चालायचं.
रोज रात्री झोपतांना तिला वाटे,"उद्या नाही जाऊ शकणार मी शाळेत. खूप थकली मी. आता ही कसरत नाही होणार माझ्याकडून...."
पण सकाळ होताच तीची त्या सोन्याचा पिंजरा तोडण्याची इच्छाशक्ती जागृत व्हायची अन् ती परत कामाला लागायची. पण शरीर ते शरीर ते थकणारंच. तिचा पहीला पगार तिच्या हातात आला. ति खूप आनंदी होती. पण थकलीही होती. ब्लडप्रेशर वाढलं, ती शाळेतच चक्कर येउन पडली. प्रिंसीपल स्वता तिला डाॅक्टरकडे घेऊन गेल्या. डाॅक्टरने अतीताणामुळे हे झाल्याचं सांगितलं.
"तुझं शरीर आणि मन तुझी संपत्ती आहे. त्यांना सांभाळनं, त्यांची निगा राखनं तुझी पहीली जबाबदारी आहे. पण असं दिसतेय की तु त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेस." प्रिंसीपल.
राणीने त्यांना तिची पुर्णकर्मकहाणी सांगितली. पण या सगळ्यांचा तिच्या कामावर काही विपरीत परिणाम होणार नाही असं आश्वासनही दिलं. सासुबाई आणि नवर्याला तिनं ठामपणे सांगितलं की भांडे घासायला आणि घर पुसायला बाई येत जाईल. तसेच या वयात सासुबाईंना खरंच पिलुमागं फिरावं लागतं. त्यांची दमछाक होते म्हणून दुपारी लंचटाईममधे येउन राणी पिलुला २ ते ५ संस्कार वर्ग आणि डे केयरला ठेवेल. तेवढाच सासुबाईंचा आराम होईल आणि रात्री त्या स्वयंपाकात तिची मदत तरी करतील किंवा पिलुला पाहतील.
राजाने थोडा वाद घातला. म्हणाला,"चार पैसे हातात नाही आले तर मॅडमचे चोचले सुरू झाले. म्हणून नाही म्हणत होतो मी नोकरीसाठी."
राणीने शांत राहण्यातच तिची भलाई समजली. कारण ब्लडप्रेशर वाढून त्रास तिलाच होणार होता.
सुरवातीला सासुबाई घरकाम करायला येणार्या बाईसोबत काम निट करत नाही म्हणून भांडल्या, तिला बोलल्या. पण राणीनेही बाईला आधीच परिस्थिती सांगीतलेली होती. त्यामुळे बाई सासुबाईंना काही उत्तरच नव्हती देत. फक्त मान हलवायची. शेवटी सासुबाई थकल्या.
पिलू छान रूळलं होतं पाळणाघरात. पाळनाघर जवळंच असल्याने सासुबाई कधीकधी जाऊन बसायच्या तिथं. नाहीतर घरी आराम करायच्या. त्यांना मनोमन पिलूला पाळणाघरात ठेवायची आयडीया पटली होती. शेवटी म्हातारं माणूस किती धावणार लेकरामागे. मग एखादवेळेस राणी घरी येताच सासू तिच्या हातात पाणी, चहा द्यायची. पिलुसोबत खेळायची. राणी मनोमन सुखावून जायची.
शाळेतही राणीचा आता बर्यापैकी जम बसला. आणि घरचंही वातावरण निवळत चाललं होतं.
"अगं एक वर्ष होईल आता तुझ्या नोकरीला. मी मानतो तु घर, नोकरी दोन्हीत उमदी आहेस. पण हौस पुर्ण झाली असेल तर पुरे आता." एक दिवस राजा राणीला म्हणाला
"राजा नोकरी फक्त एक हौस म्हणून नको होती मला. मला आवडतं बिझी राहायला. घरात राहून चिडचिड होते. डोकं काम नाही करत. हे मी तुला लग्नाआधीच सांगीतलं होतं. पण तु दुर्लक्ष केलं. मी नाही रे घरात पडून पलंग तोडणार्या बायांपैकी." त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन,"खूप कष्टाने मी या नोकरीत रूळली आहे. आता कुठं माझं त्या शाळेत एक स्थान निर्माण होत आहे. प्लिज मला माघार नका घ्यायला लाऊ."
राजाचा चेहरा पडला.
"तुला असेच वाटते ना की मला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की मी तुला विचारणार नाही. तुझं ऐकणार नाही."
"हो, म्हणजे कुठेतरी ती इनसिक्योरीटी असतेच पुरूषांना."
"पण म्हणून सर्व पुरूष त्यांच्या बायकांना घरात नाही बसवत ना!"
"हम्म!"
"माझा विश्वास कर. मी आज जशी आहे पुढेही तशीच राहील तुझ्यासोबत. चला झोपा. सकाळी ऊठायचं आहे लवकर."
राजाला झोप नाही आली. कितीतरी वेळ तो राणीबद्दल विचार करत राहला. कुठेतरी राणीचं म्हणनं पटलं त्याला. काहीतरी मनोमन ठरवुन तोही झोपला.
सकाळी चहा घेऊन पेपर वाचत न बसता राजा किचनमधे गेला. सासुबाई पिलूला घेऊन फेरफटका मारायला गेल्या होत्या. राणी कणिक मळत होती. राजाने लसण सोलायला घेतला. राणीला आश्चर्य वाटलं."मी करते. राहू दे."
"मी बोर झालाय तुझ्या हातच्या भाज्या खाउन. आज मी भाजी बनवणार." लग्नाला चार वर्ष झाल्यावर राजाने पहिल्यांदा किचनमधे पाऊल ठेवले. तेही चक्क भाजी करायला. राणीला तिनं एक वर्षांपासून केलेल्या कसरतीचं फळ मिळाले.
आता ते मिळून सर्व घरकाम करू लागले. एकमेकांच्या सोबत चालू लागले. कोणीच कोणाच्या पाठीमागे न राहता सोबत आले.
म्हणतात ना,'तुच तुझ्या जीवनाचा शील्पकार!' तसेच राणीचं झालं बघा. तीनं सोन्याचा पिंजरा तोडायची पहल केली नसती तर आयुष्यभर नवर्याला नाहीतर नशीबाला दोष देत बसली असती. हा थोडी जास्त कसरत करावी लागली तिला. पण त्या कसरतीचं फळही खूप गोड मिळाले ना!

तर माझ्या सखींनो मेहनतीला कसलाच पर्याय नाही हे लक्षात ठेऊन जिद्दीनं कामाला लागा. करा कसरत तुमची स्वप्न पुर्ण करण्यासाठी!

धन्यवाद!


@अर्चना सोनाग्रे वसतकार 

published on momspresso.com 

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...