Friday 1 May 2020

काही आवश्यक गोष्टी. मुलांच्या आत्मनिर्भरतेसाठी

लग्नानंतर आयुष्यात येणारा सर्वात मोठा बदल म्हणजे बाळ होने. संपूर्ण आयुष्य हे त्या बाळा भोवती जाणार असते. म्हणून येणाऱ्या त्याच्यासाठीही आपण आधीपासूनच काही गोष्टी नक्कीच ठरवायला हव्या. कारण बाळ झाल्यावर आपण त्याच्यात इतके गुंतून जातो की इतर कितीतरी गोष्टींचा आपल्याला विसरच पडतो. इतके लाडकोड करतो, इतके पझेसिव होतो की त्याचे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे ह्याचे भान आपल्याला राहत नाही. आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात बाधा आणणारा घटक ठरतो. हे मि आपल्याच अवतीभवतीच्या काही मुलांना अभ्यासून जाणले.
रूही, 7 वर्षांची क्यूट बार्बी डॉल मुलगी. पण तिला जर कुणी जेवन भरवले नाही तर ती खाणारच नाही. घरी ठीक आहे. शाळेत कोण भरवणार तिला?
कार्तिक 6 वर्षांचा गोड मुलगा. पण स्वतःहुन अंडरवियर घालनेही त्याला जमत नाही.
10  वर्षांची मीता, शाळेतून आल्यावर कपडे कुठे तर शूज कुठे फेकून दिलेले. आईला कोणत्याच कामात अजिबात हातभार नाही.
अयान, 22वर्ष वय असलेला पण अजूनही मार्केट मधे जाऊन स्वता काही खरेदी करने त्याला जमेना. आई वडिलांनिहि तो नुकसान करेल म्हणून अशी जबाबदारी कधी त्याच्यावर कुणी टाकलीच नाही.
सिया, 20 वर्षांची, नुकतेच लग्न होउन सासरी आलेली. घरापासून कॉलेज, मार्केट कुठेही जायला तिला कुणीतरी सोबत लागे. म्हणून नवरा कंटाळलेला. सिया तरी काय करणार, मुलीची जात म्हणून माहेरच्यांनी कुठेच तिला एकटे सोडले नव्हते.
म्हणून अथर्व पोटात होता तेव्हाच मि ठरवले होते की येणाऱ्या बाळाला आत्मनिर्भर बनवायचे. त्यासाठी मि लाडकोड आणि पझेसिवनेस एकीकडे ठेवले.
अथर्व अन्न खायला लागला तेव्हापासून त्याच्या हाती तेल मीठ पोळीचा रोल बनवून देते. तो कितीही अन्न खाली सांडो मि त्याला त्याच्या हातानेच खाऊ दिले.
तो 3वर्षाचा झाला, तेव्हापासून त्याला जमेल तसे स्वताच कपडे, शूज घालु दिले, केस करु दिले. विस्कटले तर नंतर मि निट करुन द्यायची. आता तर तो स्वताची तयारी करण्यात अगदी निपुण झालाय. अंघोळ, ब्रश हे तो त्याचेच करतो.
घरातील छोटी छोटी काम मि त्याला तो 4 चा झाला तेव्हापासूनच करायला सांगते. जसे शाळेतून आल्यावर स्वताचे कपडे, पुस्तक, बैग निट जागेवर ठेवने. खेळणी खेळून झाली की आवरुन ठेवने. जेवायला बसायच्या जागी मीठ, पाण्याची बॉटल, पोळी डबा, प्लेट्स सर्व नेऊन ठेवने. आलू, कांदे, टमाटर, भिंडी, मिरच्या वेगळ्या करने अशी काम तो आनंदाने करतो.
अथर्वला इडली खूप आवडते. इडलीवाला आला की (व्यावहारिक ज्ञान यायला हवे म्हणून) इडली घ्यायला मि अथर्वला पाठवते. दुकानात सोबत नेते तेव्हा त्यालाच पैसे मोजुन द्यायला सांगते. काटेकोर नाही जमत त्याला. पण प्रयत्न करतो तो.
तात्पर्य पुढील आयुष्यात त्याला कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही. तो आत्मनिर्भर होईल.
आशा करते की माझे विचार तुम्हाला पटले असतील. लेख वाचल्याबद्दल खूप धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...