Sunday 26 April 2020

स्वीकार भाग 1

स्वीकार भाग 2 इथं वाचा

"मनोविकार समजून घ्या, गैरसमज टाळा आणि उपचारानं आनंदी व्हा !" अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील माझं आवडतं प्रेरणादायी वाक्य.

खरंच आपण शरीराकडे किती लक्ष देतो. थोडं सर्दी पडसं झालं कि डॉक्टर कडे जातो. त्यातही आपल्या प्रत्येक इंद्रिया साठी एक स्पेशियालिस्ट आहे. दात दुखत असेल तर दाताच्या डॉक्टरकडे किंवा डोळ्यांना काही त्रास असेल तर डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे जातो. मग ज्याला आपण आपल्या शरीराचा आत्मा म्हणतो त्या मनाचं संतुलन बिघडलं असता आपण कधीच त्याचे स्पेशालिस्ट असलेल्या माणसशास्त्रज्ञाकडे, सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे का जात नाही? का आपण आपल्या मनाकडेच इतकं दुर्लक्ष करतो? का मनोविकारासाठी उपचार घ्यायला आपला जीव घाबरतो? का एखाद्याला एखादा मनोविकार जडलेला असेल तर आपण त्याला तूच्छ पाहतो, पागल असं म्हणून दूषणं लावतो? त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही होणारा त्रास आपल्याला दिसत नाही? कदाचित म्हणूनच कितीतरी लोकं आतल्या आत कुढतात पण सायकोलॉजिस्टकडे जात नाहीत.
असेच प्रश्न मला पडायचे. म्हणून मी माणसशास्त्रात पदवीधर झाले आणि पुण्याला असतांना महर्षी कर्वे इन्स्टिटयूट मधून, 'मास्टर इन काउंसिलिंग इन मेंटल हेल्थ' हा कोर्स केला. त्यावेळी माझ्या मनात या कथेने जन्म घेतला. आता ही कथा पुस्तक रूपात मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे.
ही कथा कादंबरी लिहायचा माझा मुख्य उद्देश माणसशास्त्राबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांनी माणसशास्त्रज्ञाची मदत जरूर घ्यावी हा आहे. तसेच सामान्य लोकांनी मानसिक रुग्णांना समजून घ्यावं हिच अपेक्षा. आपल्या बंधू भगिनी पैकी कोणाला असा त्रास असेल तर त्यांना वाळीत न टाकता उपचार घेण्यात मदत करावी.
लेखन रोचक असलं की वाचणाऱ्याला ते प्रेरित करतं. म्हणून बायपोलर हा मानसिक रोग असलेल्या एका स्त्रीची प्रेमळ कथा इथे मी रंगवली आहे.
कधी कधी लिहिण्याच्या ओघात भान राहत नाही. त्यामुळे काही चूकभूल झाली असेल तर कमेंट करून सांगा. 

तर ही कथा आहे आराधनाची. आज तिचा सत्तेचाळीसवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि धुमधामीत साजरा करण्यात आला. पहिल्यांदा सत्य हे स्वप्नापेक्षाही कितीतरी सुंदर असु शकतं याची प्रचिती आली. जीवन मनभरून जगल्यासारखं वाटतय तिला तेही तब्बल एकविस वर्षांनी ! गंमतीचीच गोष्ट आहे ना .... एकवीस वर्ष बाहेरच्या जगाचा स्पर्श नाही, अंधार्या कोठडीत राहणं आणि अचानक झोपेतून जाग आली म्हणून उठून बाहेरच्या जगाशी संपर्क साधायचा. किती वेगळं अन् कठीण ! सगळं बदलेलं होतं. वाढलेलं वय, पांढरे झालेले केस, चेहर्यावरची कांती जाउन आलेल्या सुकृत्या ... हे झालं आराधनाचं. पण हे जग ... हेही किती बदलेलं. किती टेक्निकल झालेलं. ते आराधनाला, एका पागलखान्यात एकविस वर्ष पागल म्हणुन वास्तव्य केलेल्या बाईला (नाॅर्मल म्हणून) स्वीकारेल का ? आणि ती सुद्धा ह्या बदललेल्या टेक्नोसॅव्ही झालेल्या जगाला स्वीकारू शकेल का ? दोन्हीही गोष्टी सहजा सहजी होणे फार कठीण. पण ज्याच्याजवळ कोणितरी असतं ना, अगदी आपलं, हृदयापासुन आपल्याला जपणारं, त्याच्यासाठी सगळंच शक्य असतं बघा 😊.
तर अशीच आहे अरुची(आराधनाला प्रेमानी सर्व अरु म्हणायचे) राधा. राधानं सगळं शक्य आणि सोपं केलं अरुसाठी. ति नसती ना तर अरुचा अंत सुद्धा त्या पागलखान्यातच झाला असता. म्हणायला त्यांच्यात रक्ताचं असं काही नातं नाही. पण मनाचं आहे. दोघी मैत्रीणी एकमेकिंच्या, अगदी जिवाभावाच्या.....
अरु एकविस वर्षांनी वेडेपणातुन बाहेर कशी आली ना ती एक गम्मतच आहे. एखाद्या सिनेमासारखी !
तर तिन महीन्या आधी राधेच्या मुलाचा अमनचा साखरपुडा झाला. होणारी सुन खुपच मस्त,'फुलराणी' नाव ऐकुनच मोहरल्यासारखं वाटतं. ती नावाजलेली मुक्त पत्रकार आणि लेखिकाही, तरूणपणी अरुची आयडॉल असलेल्या शोभा डे ची आठवण झाली अरुला फुलराणीला पाहून. पोरीचं वय वर्ष फक्त एकोणविस ? बापरे ? पोटातून पडल्याबरोबर शाळेत गेली की काय ? असं अरुच्या मनात आलं. पण 2019 साल म्हणजे किती पुढारलेलं जग आणि इतक्या लवकर साखरपुडा का ? अमनला आणि फुलराणीला फक्त लिव्हइन मधेच राहायचं होतं. मग ही साखरपुडा, लग्न? झालं असं कि,
अमन नेव्ही इंजीनियरींग काॅलेजमधे पुण्याला पहिल्या वर्षाला असतांना एका डाॅक्युमेंटरी निमित्त फुलराणीचे सतत तिथं येणे जाणे व्हायचे. तेव्हा अमन आणि फुलराणिची मैत्री झाली. फुलराणिची आई एक सिंगल पॅरेंट, एक सायकोलॉजिस्ट. मूळची महाराष्ट्रीयन पण बाबा नोकरीला  दिल्लीला होते. लहानपण, शिक्षण सगळं दिल्लीतच. म्हणून तिथंच स्थायी झाली. तिनं फुलराणीला खुप मोकळं वातावरण दिलं. म्हणून की काय फुलराणी अगदी बिंधास्त झाली. कितीतरी देश एकटीच फिरली. शाळेतच तीने एक पत्रकार आणि टिनेज टॉप ब्लॉग राइटर म्हणून नाव कमवले. तसेच यूथ लव स्टोरीज़, बी लाइक मी, लाइफ इज जिप्सी, ही तिची तीन नॉवेल तरुण मंडलळीने चक्क डोक्यावर घेतली. तिचे टॅलेंट पाहून सिंबाॅइसीस काॅलेजने तिला पत्रकारीतेची पदवी तिच्या अठराव्या वर्षिच बहाल केली. आता तिला आयुष्यात नविन काहीतरी हवे होते.
"मला तुझ्याशी लग्न करायचं आहे."फुलराणीने अमनला प्रपोज केलं.
"काय?" अमनने अंगावर पाल पडल्यापेक्षाही जास्त बेकार रिॲक्शन दिलं,"अग मि काहीच कमवीत नाही."
"मि कमवीत आहे ना." काहीतरी काउंटींग करत,"मि लिहीलेल्या पुस्तकांची राॅयल्टी आणि पत्रकारीतेचे मिळून २५-३० हजार येतात बाकी राहायला आपापली घरं आहेतच आणि काॅंट्रंक्ट मॅरेज करू. पटलं तर राहू सोबत नाही तर नाही."
"??????"
"मला बघायचं आहे लग्न करून!"
''म्हणजे ?''
''अरे मला नवीन काहीतरी लिहायचे आहे आणि लग्न हा विषय खूपच भावला मला आणि बघ विथ एक्सपेरियंस लिहिले तर रियलिटीचा टच मिळेल ना ''
अमन नाही म्हनू नाही शकला. त्यालाही फुलराणी आवडायची. सर्वांनी समजावले. पण फुलराणी म्हणाली,''बघा अजून 2-3 वर्षान्नी काय आणि आज काय, लग्न ते लग्न आणि अमन सोबतच करेल हा ठाम निर्णय.''
राधा काही कमी नाही ती म्हणाली,''ठीक आहे करा लग्न पण आधी साखरपुड़ा करून फुलरानी तीन महीने माझ्यासोबत राहील. आम्ही दोघी एकमेकींना जाणून घेऊ. नंतर लग्न.''
''वाउ ग्रेट ... म्हणजे मला आणखी एक विषय मीळेल लिहायला.'' असे म्हणून तिने राधाला मीठी मारली,''माझी होणारी सासु ... नाही माझ्या होणारया नवरयाची आई.''
राधा विचार करत होती ह्या रोबोट युगात हे काय खुळ माझ्या नशीबी येतेय. एक आमचा काळ होता, लवकर लग्न नाही करायचे म्हणून किती तांडव करावे लागे आणि ही पोरगी एकोणविसाव्या वर्षिच लग्न करतो म्हनतेय. कशाला तर पुस्तक लिहायला अनुभव हवा म्हणून .. असो कमित कमी अमन मुलीशीच लग्न करतोय हेच खूप आहे. नाहीतर त्याचा मित्र केवल, त्याच्या लक्षणावरून तर भीतीच वाटायची की, पोरगं सुनिच्या ऐवजी जावई आणेल अन्'माँ दा लाडला बिघड़ गया' म्हणावे लागेल आपल्याला.
साखरपुड़ा झाल्यावर फुलराणी राधाच्या घरी तिच्यासोबतच राहू लागली. राधाला सकाळी ऑफीसला ड्रॉप करने, संध्याकालळी पीक अप करने. शॉपिंगला घेऊन जाणे. अर्थात राधा जिथे जाईल तिथे फूलरानी तिच्या सोबत असायची. राधा दर एक-दोन महिन्यातुन अरुला भेटायला असायलम मधे यायची. यावेळेस आली तेव्हा फूलरानी सोबतच होती. फुलराणीने खुप विचारले कोणाला भेटु ते ? पण राधानी फक्त एवढंच सांगितलं की तिला पुस्तक लिहायला एक नविन कॅरेक्टर मिळेल. तुझ्यासारखंच आकाशाला मुठीत बंद करू पाहणारं, तुला चान्स मिळाला ग! तिनेच माहीत नाही काय वाईट केलं कोणाचं ?" फुलराणीला राधेच्या असं बोलण्याचा अर्थ अरुला भेटल्यावर कळला.
एका बंद पिंजर्यात अंधारात होती ती. 26 वर्षाची असतांना (म्हणजे 1998-99 साल सुरु होतं) तिला नैराश्यानं जकडले आणि पाहता पाहता ती एक बायपोलरची रूग्ण झाली ! घडीला पाणी तर घडीला आग, असा होता तिचा ताल.
क्रमश:
काही महिन्यांपूर्वी हीच कथा मी, 'मी अमृता' या नावाने मॉम्सप्रेसो वर लिहायला सुरु केली होती. पण मधेच साहित्यचोरी प्रकार पुढे आल्याने मी पुढले भाग इथे टाकलेच नव्हते. आता तीच कथा 'स्वीकार' या नावाने आणि अधिक समर्पकतेने परत एकदा लिहितेय आणि आपल्यासमोर प्रस्तुत करतेय. आशा आहे आपल्याला नक्की आवडेल. आवडल्यास माझ्या नावासोबत शेयर नक्की करा आणि प्लिज मला फाॅलो करा. म्हणजे नंतरचे भाग तुम्हाला शोधत बसावे लागणार नाहीत. तर ते प्रकाशीत होताच तुम्हाला नोटीफीकेशन मिळेल.
फोटो फ्रॉम गुगल🙏.
धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 😊🙏
archusonagre@gmail.com

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...